शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:50 IST

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते.

जालना : पावसाळा सुरू होऊन सुमारे ४५ दिवसांचा कालावधी झालेला असला तरी, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जुलै महिना सुरू झालेला असला तरी, अद्याप जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती संपलेली नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७ जूनपासून जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामुळे भरपावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.

मागील वर्षी हीच स्थितीमागील वर्षीदेखील कमी पावसामुळे पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदादेखील अशीच स्थित जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील वर्षी २५ जुलै रोजी २२० टँकरद्वारे जिल्ह्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा २८ जुलै रोजी जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात टंचाई निवारण आराखड्यास मंजुरी दिली होती. टंचाई आराखड्याची मुदत ३१ जून रोजी संपली होती. मात्र, कमी पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण टंचाई सुरू होती. यामुळे टंचाई आराखड्यास ३१ जुलैपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आराखड्यात पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

भोकरदन शहरात ३५ टँकर सुरूसध्या भोकरदन शहरातील नागरिकांची तहान मागील आठ महिन्यापासून टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरण पूर्णपणे काेरडे पडलेले असल्याने भोकरदन शहराला पावसाळ्यातदेखील टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. सध्या शहरात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाRainपाऊस