शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:50 IST

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते.

जालना : पावसाळा सुरू होऊन सुमारे ४५ दिवसांचा कालावधी झालेला असला तरी, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जुलै महिना सुरू झालेला असला तरी, अद्याप जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती संपलेली नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७ जूनपासून जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामुळे भरपावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.

मागील वर्षी हीच स्थितीमागील वर्षीदेखील कमी पावसामुळे पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदादेखील अशीच स्थित जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील वर्षी २५ जुलै रोजी २२० टँकरद्वारे जिल्ह्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा २८ जुलै रोजी जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात टंचाई निवारण आराखड्यास मंजुरी दिली होती. टंचाई आराखड्याची मुदत ३१ जून रोजी संपली होती. मात्र, कमी पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण टंचाई सुरू होती. यामुळे टंचाई आराखड्यास ३१ जुलैपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आराखड्यात पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

भोकरदन शहरात ३५ टँकर सुरूसध्या भोकरदन शहरातील नागरिकांची तहान मागील आठ महिन्यापासून टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरण पूर्णपणे काेरडे पडलेले असल्याने भोकरदन शहराला पावसाळ्यातदेखील टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. सध्या शहरात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाRainपाऊस