शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:50 IST

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते.

जालना : पावसाळा सुरू होऊन सुमारे ४५ दिवसांचा कालावधी झालेला असला तरी, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जुलै महिना सुरू झालेला असला तरी, अद्याप जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती संपलेली नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७ जूनपासून जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामुळे भरपावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.

मागील वर्षी हीच स्थितीमागील वर्षीदेखील कमी पावसामुळे पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदादेखील अशीच स्थित जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील वर्षी २५ जुलै रोजी २२० टँकरद्वारे जिल्ह्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा २८ जुलै रोजी जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात टंचाई निवारण आराखड्यास मंजुरी दिली होती. टंचाई आराखड्याची मुदत ३१ जून रोजी संपली होती. मात्र, कमी पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण टंचाई सुरू होती. यामुळे टंचाई आराखड्यास ३१ जुलैपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आराखड्यात पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

भोकरदन शहरात ३५ टँकर सुरूसध्या भोकरदन शहरातील नागरिकांची तहान मागील आठ महिन्यापासून टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरण पूर्णपणे काेरडे पडलेले असल्याने भोकरदन शहराला पावसाळ्यातदेखील टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. सध्या शहरात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाRainपाऊस