शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा; रूई येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:48 AM

अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील रुई येथे सुरू असलेल्या टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी तक्रारीद्वारे ही बाब पंचायत समितीच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीनुसार पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करीत गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.रुई येथे सद्यस्थितीत अधिकृत अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीऐवजी बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरून पैठण डाव्या कालव्यातील साचलेले पाणी गावात खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करून पिण्यायोग्य व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पंचांसमक्ष पंचायत समितीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे एस. ए. जाधव यांनी सकाळी पंचनामा केला. दूषित पाण्यामुळे साथरोग पसरण्याची भिती आहे. गावात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब कार्यवाही करून ग्रामपंचायतने अधिग्रहण केलेल्या विहिरीतूनच शुद्ध पाण्याचा टँकरद्वारे गावाला पुरवावा, असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. पंचनाम्यावर एकनाथ पटेकर, ईश्वर धाईत, शरद मुळे, कृष्णा खंडरे, तात्यासाहेब राजगुरू, संजय लहामगे आदींची स्वाक्षरी आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या पुढील भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यpanchayat samitiपंचायत समिती