शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
2
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
3
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
4
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
5
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
6
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
7
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
8
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
9
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
10
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
11
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
12
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
13
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
14
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
15
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
16
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
17
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
18
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
19
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
20
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड

जालन्यात संतप्त नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:05 AM

पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : टँकरने पाणीपुरवठा करावा, काहीकाळ वाहतूक ठप्प

जालना : शहराचा पाणी पुरवठा वीस दिवसापासून विस्कळीत झाला आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय सुरु आहे. पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. यावेळी परिसरात वाहनांच्या रांगाच - रांगा लागल्या होत्या.वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक वैतागले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते. असे असतांना पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही यावेळी संतप्त नागरिकांनी केला. शहरात येणाऱ्या पाण्याची चोरी होत असल्याने शहरात वीस दिवसापासून पाणी येत नसल्याचे सांगितल्या जाते. मात्र, कन्हैयानगर येथे गेल्या दोन महिन्यापासून नागरिक पाण्याविना हैराण आहे.शहराच्या पाणी वाटपावरुन राजकारण करण्यात येत आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून जात असल्याचा आरोप येथील नगरसेवक राहुल इंगोले यांनी केला.झोपडपट्टी परिसर असल्याने विकतचे पाणी घेण्याची परिस्थिती येथील नागरिकांची नाही. सर्वजण मोल- मजूरी करुन पोटभरणारे आहेत. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येणारे कोठे लपून बसले असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी केला. वाहनांची वर्दळ असलेल्या कैन्हैयानगर येथील चौफुलीवर तासभर आंदोलन करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.आश्वासनानंतर आंदोलन मागेनगरपालिकाचे पाणी पुरवठा सभापती रमेश गोरंक्षक, आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घुगे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. शनिवारी संध्याकाळपर्यत कन्हैयानगर परिसरात पाणी सोडण्याचे आश्वासन सभापती, अभियंत्याने दिल्याने तासाभºयानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चंदनझिरा पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Jalanaजालनाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन