शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

परभणीला पाणी न देण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:17 IST

निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू देणार नसल्याचा निर्धार केलेल्या शेतकरी आणि धरण संघर्ष समितीच्या वतीने रोहीणा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू देणार नसल्याचा निर्धार केलेल्या शेतकरी आणि धरण संघर्ष समितीच्या वतीने रोहीणा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान रोडवर दोन्ही बाजंूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेकांचे विवाहमुहूर्त टळल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पात आता केवळ मृत पाणीसाठा आहे. आणि या साठ्यातून परभणीकडे पात्रातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या पाणी सोडण्याला विरोध म्हणून आता सर्वच पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी धरण संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याला विरोध म्हणून रोहिणा पुलावर जलसमाधी आणि रास्ता रोको आंदोलन केले. या दोन तास चालेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहने खोळंबली होती. या मध्ये बस व प्रवासी वाहतूक करणारी वाहने होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे रास्ता रोको आंदोलन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भ्रमणध्वनी वरून दिलेल्या आश्वासनांनतर दुपारी १ वाजता मागे घेण्यात आले.आंदोलना दरम्यान कोंडी झालेल्या वाहनांत प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांचा समावेश होता. यामुळे महिला व मुले घामाघूम झाली होती.या आंदोलना दरम्यान जि. प. सदस्य राहूल लोणीकर यांनी शेकतरी व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलन सोम्य केले. तोपर्यंत रोहिणा पुलावर दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली होती. शेवटी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या आश्वासनांनतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य राहुल लोणीकर, सभापती रामेश्वर तनपुरे, सुधाकर सातोनकर, सुधाकर बेरगुडे, रमेश चव्हाण, बंडू मानवतकर, प्रकाश गाढेकर, संपत टकले, विठ्ठल बिडवे, किसन राऊत, संदीप बाहेकर, रमेश भापकर, प्रकाश चव्हाण, श्रीकांत उन्मुखे यांच्यासह २० गावातील शेतकरी उपस्थित होते.मृत जलसाठ्यावर मदार असल्याने परभणीला पाणी नाही : बबनराव लोणीकरया आंदोलना दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आमचा पाणी सोडण्याला विरोध नाही, पाण्याच्या नासाडीला विरोध आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यास टँकरने कितीही पाणी न्यावे. जेव्हा पाणी होते तेव्हा दिले. आता धरणातच पाणी नाही. तर ते सोडायचे कसे, असे ते म्हणाले.केवळ मृतसाठ्यावर भविष्यातील पाणी टंचाईची मदार आहे. सिध्देश्वर धरणातून रहाटी धरणात पाणी साठवण करण्यात आले आहे. १० जून पर्यत पाणी परभणी शहराला पाणी पुरेल, एवढा पाणीसाठा रहाटी धरणात आहे. तसे या अधिकाऱ्यांनीही कळवले आहे.बॅक वॉटरवरील एकाही शेतक-याची विद्युत मोटार जप्त करण्यात येणार नाही. या बरोबरच परभणीला पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे हे रास्ता रोको व जलसमाधी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती लोणीकरांनी केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :riverनदीDamधरणWaterपाणीBabanrao Looneykarबबनराव लोणीकर