शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यास असमर्थ -काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्या ऐवजी नियमांवर बोट ठेवून त्यांना वेठीस धरले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्या ऐवजी नियमांवर बोट ठेवून त्यांना वेठीस धरले जात आहे. चारा छावण्या सुरू करणे, रोजगार हमीची कामे वेळेत सुरू न करणे तसेच पाणी आणि चा-याची व्यवस्था करण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारविरूध्द जनतेत तीव्र नाराजी असल्याचे दिसून आले. बुधवारी काँग्रेसचे शिष्टमंडळ थेट शेतक-यांच्या बांधावर पोहोचले. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता पदाधिकाºयांनी चारा छावणी, रोजगार हमीच्या कामांना भेटी दिल्या.काँग्रेसच्या या शिष्ट मंडळात दुष्काळ निवारण समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री बसवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, मराठवाड्याचे समन्वयक भीमराव डोंगरे, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, विजय कामड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, राजेंद्र राख, विष्णू कंटुले, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद प्रा. सत्संग मुंढे आदींचा समावेश होता. काँग्रेसच्या वतीने दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी हे शिष्टमंडळ जालना दौºयावर आले होते.यावेळी त्यांनी प्रथम अंबड तालुक्यातील नांदी येथील चारा छापणीला भेट दिली. तेथे त्यांनी चारा छावणी चालकांशी संवाद साधला. यावेळी छावणी सुरू करण्यास विलंब झाल्याचे परिसरातील पशुपालकांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले. नांदी नंतर हे शिष्टमंडळ जालना तालुक्यातील धावेडी येथे गेले. तेथे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन मजुरांशी संवाद साधला. यावेळी मजुरांनी त्यांच्या व्यथा मांडला.बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथेही या पदाधिकाºयांनी भेट दिली. कडेगाव येथे शेतकरी मेळावा घेऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमाफी, पीकविमा आणि अन्य मुद्यांवरून शेतकºयांमध्ये प्र्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. या शिष्टमंडळा सोबत डॉ.श्याम पांढरे, माजी नगरसेवक वैभव उगले, प्रकाश नारायणकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांची थट्टा केली : आम्ही ३५ हजार रूपये दिलेशेतकºयांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फळबागा या २०१२ मध्ये दुष्काळात प्रति हेक्टरी ३५ हजार रूपयांची मदत केली होती. तसेच आठ दिवसात चारा छावणीला मंजुरी दिली जात होती. आताचे हे सरकार केवळ जुमलेबाज असून, सरकारला दुष्काळाची दाहकता कळत नसल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दुष्काळाचा आढावा घेणे म्हणजे शेतकºयांची एकप्रकारे थट्टा असल्याचे बसवराज पाटील यांनी सांगितले. यावेळी औताडे, जेथलिया, डोंगरे यांचीही भाषणे झाली. राजाभाऊ देशमुख यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी मंडळींचे दुष्काळाकडे असलेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे सांगून शेतक-यांचा तळतळाट या सरकारला लागल्या शिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार