शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यास असमर्थ -काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्या ऐवजी नियमांवर बोट ठेवून त्यांना वेठीस धरले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्या ऐवजी नियमांवर बोट ठेवून त्यांना वेठीस धरले जात आहे. चारा छावण्या सुरू करणे, रोजगार हमीची कामे वेळेत सुरू न करणे तसेच पाणी आणि चा-याची व्यवस्था करण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारविरूध्द जनतेत तीव्र नाराजी असल्याचे दिसून आले. बुधवारी काँग्रेसचे शिष्टमंडळ थेट शेतक-यांच्या बांधावर पोहोचले. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता पदाधिकाºयांनी चारा छावणी, रोजगार हमीच्या कामांना भेटी दिल्या.काँग्रेसच्या या शिष्ट मंडळात दुष्काळ निवारण समितीचे प्रमुख तथा माजी मंत्री बसवराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, मराठवाड्याचे समन्वयक भीमराव डोंगरे, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, विजय कामड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, राजेंद्र राख, विष्णू कंटुले, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद प्रा. सत्संग मुंढे आदींचा समावेश होता. काँग्रेसच्या वतीने दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी हे शिष्टमंडळ जालना दौºयावर आले होते.यावेळी त्यांनी प्रथम अंबड तालुक्यातील नांदी येथील चारा छापणीला भेट दिली. तेथे त्यांनी चारा छावणी चालकांशी संवाद साधला. यावेळी छावणी सुरू करण्यास विलंब झाल्याचे परिसरातील पशुपालकांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले. नांदी नंतर हे शिष्टमंडळ जालना तालुक्यातील धावेडी येथे गेले. तेथे त्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन मजुरांशी संवाद साधला. यावेळी मजुरांनी त्यांच्या व्यथा मांडला.बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथेही या पदाधिकाºयांनी भेट दिली. कडेगाव येथे शेतकरी मेळावा घेऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमाफी, पीकविमा आणि अन्य मुद्यांवरून शेतकºयांमध्ये प्र्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. या शिष्टमंडळा सोबत डॉ.श्याम पांढरे, माजी नगरसेवक वैभव उगले, प्रकाश नारायणकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांची थट्टा केली : आम्ही ३५ हजार रूपये दिलेशेतकºयांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फळबागा या २०१२ मध्ये दुष्काळात प्रति हेक्टरी ३५ हजार रूपयांची मदत केली होती. तसेच आठ दिवसात चारा छावणीला मंजुरी दिली जात होती. आताचे हे सरकार केवळ जुमलेबाज असून, सरकारला दुष्काळाची दाहकता कळत नसल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दुष्काळाचा आढावा घेणे म्हणजे शेतकºयांची एकप्रकारे थट्टा असल्याचे बसवराज पाटील यांनी सांगितले. यावेळी औताडे, जेथलिया, डोंगरे यांचीही भाषणे झाली. राजाभाऊ देशमुख यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी मंडळींचे दुष्काळाकडे असलेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे सांगून शेतक-यांचा तळतळाट या सरकारला लागल्या शिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार