शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

अध्यात्म हाच सुखी जीवन जगण्याचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:56 AM

आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अध्यात्म हाच जीवनाचा पाया आहे. हजारो वर्षापूर्वी ज्यावेळी मंदिरे नव्हती, त्यवेळी घर हे एक मंदिर होते. मात्र कालांतराने स्वार्थ आणि परमार्थात दरी वाढत गेल्याने कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढत गेले. त्यातूनच मंदिरांची निर्मिती झाली. मंदिरात जाताना आपण षडरिपू बाजूला ठेवूनच जाणे अपेक्षित असते, मात्र आपण कुठली ना कुठली इच्छापूर्ती व्हावी म्हणून देव-देव करत असू तर ते अध्यात्म नाही.आज टीव्हीसह मोबाईलच्या आक्रमणाने घराघरात एक प्रकारचे चित्रपटगृह झाले आहे. हे कुठे तरी थांबवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामप्रसाद साळुंके यांनी केले.चेतना ज्येष्ठ नागरिक संस्थेकडून रविवारी साळुंके यांच्या विशेष व्याख्यानोच आयोजन केले होते. यावेळी महेंद्रकुमार गुप्ता, सुभाष देविदान, अशोक हुरगट, अ‍ॅड. सीताराम धन्नावत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. साळुंके यांचा परिचय झंवर यांनी करून दिला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे सांगितले.भगवद् गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे सांगतानाच त्यांनी त्यात जे कौरव आणि पांडवांचे जे युध्द दर्शविले आहे, त्यात तथ्य नसल्याचे सांगून ते महाभारताच्या माध्यमातून त्यात आले आहे. श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली म्हणजे याचा अर्थ असा नसून, ती एकट्या अर्जुनाला सांगितली.अर्जुन या शब्दाचा अर्थ च मुळात आत्मसात करणारा असा आहे.एकूणच महाराष्ट्रात संतांनी जो भक्ती मार्ग दाखवला आहे, त्या वाटेवर आपण चालल्यास मिळालेले जीवन सार्थकी लागू शकते.आपल्यातील अहंकार आणि स्वार्थ बाजूला ठेवल्या निखळ आनंदी जीवन जगता येते. संसाररूपी रहाटगाडग्यात आपण केव्हा वयस्कर होतो, हे कळत नाही.किमान आता ज्येष्ठ नागरिक झाल्यावर आपण जबाबदारीतून मुक्त होऊन ईश्वराचे चिंतनात वेळ घालविण्याचे आवाहन साळुंके यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक हुरगट यांनी केले.

टॅग्स :Familyपरिवारspiritualअध्यात्मिक