शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने सोयाबीनची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:34 IST

परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी, बँक, कृषी, अथवा महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका ठिकाणी पिकांच्या नुकसानी संदर्भात तात्काळ माहिती देणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी, शनिवार, रविवारी व सोमवारी जोराचा पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांच्या हाता- तोंडाशी आलेला बाजरी व सोयाबीनचा घास वाया गेला आहे. तसेच वेचणीला आलेल्या कापसाचे देखील नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाही. तर अनेक ठिकाणी काढलेली सोयाबीन जमा करण्यात आली नसल्याने शेंगा काळसर पडल्या आहेत. यामुळे बळीराजा अडचणीत सापडला असल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांच्यासह कडवंची येथील शेतक-यांनी केली आहे.विमा संरक्षण घेतलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यास शेतक-यांनी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग किंवा बँकेला कळविणे गरजेचे आहे. तसेच सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील सांगणे बंधनकारक आहे.यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकºयांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विहित नमुन्यात प्रस्ताव द्यावा, अशी माहिती ग्राहक सेवा केंद्राचे ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. अर्जासोबत विमाहप्ता भरल्याची पावती जोडणेही आवश्यक आहे.हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान ...बदनापूर : तालुक्यात मागील एक- दोन दिवसांमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांबरोबर रबी पिकांनाही मोठा फायदा होणार आहे. मात्र, हाती आलेल्या मका, सोयाबीन व बाजरी पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.बदनापूर शहरासह रोषणगाव, दाभाडी, शेलगाव, बावणे पांगरी या पाचही मंडळातील विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाचा कापूस, तुर इ. खरीप पिकांसह शाळू ज्वारी, हरभरा या रबी पिकांनाही फायदा होणार आहे़ यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे़ हा पाऊस बदनापूर मंडळात ४६ मिमी, रोषणगाव ४३ मिमी, दाभाडी ११५ मिमी, शेलगाव ४५ मिमी, बावणे पांगरी ५० मिमी असा एकूण २९९ मिमी. झाला आहे. याची सरासरी ५९़८ मिमी आहे़सध्या तालुक्यात बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची काढणी सुरू आहे. या पावसामुळे ही पिके भिजत आहे़ तसेच येणाºया आभाळामुळे तुरीच्या पिकावर रोगराई येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़शहरवासियांचे आरोग्य धोक्यात; धूर फवारणीची मागणीबदनापूर शहरात सद्यस्थितीत चिखलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे डासांची संख्याही वाढली आहे. शहरवासियांना मलेरिया, डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांची लागण होऊ शकते, यासाठी नगरपंचायतच्यावतीने शहरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी