शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

परतीच्या पावसाने सोयाबीनची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:34 IST

परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी, बँक, कृषी, अथवा महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका ठिकाणी पिकांच्या नुकसानी संदर्भात तात्काळ माहिती देणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी, शनिवार, रविवारी व सोमवारी जोराचा पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांच्या हाता- तोंडाशी आलेला बाजरी व सोयाबीनचा घास वाया गेला आहे. तसेच वेचणीला आलेल्या कापसाचे देखील नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाही. तर अनेक ठिकाणी काढलेली सोयाबीन जमा करण्यात आली नसल्याने शेंगा काळसर पडल्या आहेत. यामुळे बळीराजा अडचणीत सापडला असल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांच्यासह कडवंची येथील शेतक-यांनी केली आहे.विमा संरक्षण घेतलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यास शेतक-यांनी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग किंवा बँकेला कळविणे गरजेचे आहे. तसेच सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील सांगणे बंधनकारक आहे.यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकºयांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विहित नमुन्यात प्रस्ताव द्यावा, अशी माहिती ग्राहक सेवा केंद्राचे ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. अर्जासोबत विमाहप्ता भरल्याची पावती जोडणेही आवश्यक आहे.हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान ...बदनापूर : तालुक्यात मागील एक- दोन दिवसांमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांबरोबर रबी पिकांनाही मोठा फायदा होणार आहे. मात्र, हाती आलेल्या मका, सोयाबीन व बाजरी पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.बदनापूर शहरासह रोषणगाव, दाभाडी, शेलगाव, बावणे पांगरी या पाचही मंडळातील विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाचा कापूस, तुर इ. खरीप पिकांसह शाळू ज्वारी, हरभरा या रबी पिकांनाही फायदा होणार आहे़ यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे़ हा पाऊस बदनापूर मंडळात ४६ मिमी, रोषणगाव ४३ मिमी, दाभाडी ११५ मिमी, शेलगाव ४५ मिमी, बावणे पांगरी ५० मिमी असा एकूण २९९ मिमी. झाला आहे. याची सरासरी ५९़८ मिमी आहे़सध्या तालुक्यात बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची काढणी सुरू आहे. या पावसामुळे ही पिके भिजत आहे़ तसेच येणाºया आभाळामुळे तुरीच्या पिकावर रोगराई येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़शहरवासियांचे आरोग्य धोक्यात; धूर फवारणीची मागणीबदनापूर शहरात सद्यस्थितीत चिखलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे डासांची संख्याही वाढली आहे. शहरवासियांना मलेरिया, डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांची लागण होऊ शकते, यासाठी नगरपंचायतच्यावतीने शहरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी