शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

परतीच्या पावसाने सोयाबीनची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 01:34 IST

परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी, बँक, कृषी, अथवा महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका ठिकाणी पिकांच्या नुकसानी संदर्भात तात्काळ माहिती देणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शुक्रवारी, शनिवार, रविवारी व सोमवारी जोराचा पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतक-यांच्या हाता- तोंडाशी आलेला बाजरी व सोयाबीनचा घास वाया गेला आहे. तसेच वेचणीला आलेल्या कापसाचे देखील नुकसान झाले आहे. एकीकडे सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नाही. तर अनेक ठिकाणी काढलेली सोयाबीन जमा करण्यात आली नसल्याने शेंगा काळसर पडल्या आहेत. यामुळे बळीराजा अडचणीत सापडला असल्याने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी दादासाहेब भुतेकर यांच्यासह कडवंची येथील शेतक-यांनी केली आहे.विमा संरक्षण घेतलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाल्यास शेतक-यांनी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग किंवा बँकेला कळविणे गरजेचे आहे. तसेच सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील सांगणे बंधनकारक आहे.यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकºयांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विहित नमुन्यात प्रस्ताव द्यावा, अशी माहिती ग्राहक सेवा केंद्राचे ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. अर्जासोबत विमाहप्ता भरल्याची पावती जोडणेही आवश्यक आहे.हाती आलेल्या खरीप पिकांचे नुकसान ...बदनापूर : तालुक्यात मागील एक- दोन दिवसांमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांबरोबर रबी पिकांनाही मोठा फायदा होणार आहे. मात्र, हाती आलेल्या मका, सोयाबीन व बाजरी पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.बदनापूर शहरासह रोषणगाव, दाभाडी, शेलगाव, बावणे पांगरी या पाचही मंडळातील विविध गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाचा कापूस, तुर इ. खरीप पिकांसह शाळू ज्वारी, हरभरा या रबी पिकांनाही फायदा होणार आहे़ यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे़ हा पाऊस बदनापूर मंडळात ४६ मिमी, रोषणगाव ४३ मिमी, दाभाडी ११५ मिमी, शेलगाव ४५ मिमी, बावणे पांगरी ५० मिमी असा एकूण २९९ मिमी. झाला आहे. याची सरासरी ५९़८ मिमी आहे़सध्या तालुक्यात बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची काढणी सुरू आहे. या पावसामुळे ही पिके भिजत आहे़ तसेच येणाºया आभाळामुळे तुरीच्या पिकावर रोगराई येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़शहरवासियांचे आरोग्य धोक्यात; धूर फवारणीची मागणीबदनापूर शहरात सद्यस्थितीत चिखलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे डासांची संख्याही वाढली आहे. शहरवासियांना मलेरिया, डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांची लागण होऊ शकते, यासाठी नगरपंचायतच्यावतीने शहरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी