शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

सोशल मिडिया, मोबाईलमुळे पती-पत्नीमध्ये वाढती भांडणे; भरोसा सेलमधील तक्रारीमधून उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:40 IST

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद

जालना : मोबाईलवर तास तास बोलणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वाढलेला वापर पती-पत्नींमधील भांडणाला फोडणी टाकत आहे. गत दोन वर्षांत भरोसा सेलमध्ये तब्बल १२६४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामोपचारानंतरही समेट घडत नसल्याने त्यातील २४७ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. येथील भरोसा सेलमध्ये सन २०१९ मध्ये ७४९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४१३ प्रकरणांत समोपचारानंतर आपापसात तडजोड करण्यात आली. तडजोड होत नसल्याने २१६ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. १९ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, १०१ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर चालू वर्षात ५१५ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील ७६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे. तडजोड होत नसलेली ३१ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत, तर १२ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, ३९७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेसंशयी वृत्ती, व्यसनाधीनता, वाढलेला मोबाईलचा वापर, सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे, हुंड्याची मागणी, प्रॉपर्टीचा वाद, शेतजमिनीचे कारण, सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद वाढले आहेत. विशेषत: मोबाईलचा अतिवापर हा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र भरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येत आहे.

४८९ प्रकरणांत समेटभरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींनुसार माहेर- सासरच्या मंडळींसह दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेल्या संसारात पुन्हा हास्य फुलविण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करतात. गत दोन वर्षांमध्ये भरोसा सेलकडून ४८९ प्रकरणांत आपापसात तडजोड करण्यात आली आहे.

मोबाईलचा वापर, संशयीवृत्ती, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत असल्याचे आमच्याकडे दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येते. तक्रार दाखल झाल्यानंतर दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.- एस.बी. राठोड, भरोसा सेलप्रमुख

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाFamilyपरिवार