शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

सोशल मिडिया, मोबाईलमुळे पती-पत्नीमध्ये वाढती भांडणे; भरोसा सेलमधील तक्रारीमधून उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:40 IST

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद

जालना : मोबाईलवर तास तास बोलणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वाढलेला वापर पती-पत्नींमधील भांडणाला फोडणी टाकत आहे. गत दोन वर्षांत भरोसा सेलमध्ये तब्बल १२६४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामोपचारानंतरही समेट घडत नसल्याने त्यातील २४७ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. येथील भरोसा सेलमध्ये सन २०१९ मध्ये ७४९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४१३ प्रकरणांत समोपचारानंतर आपापसात तडजोड करण्यात आली. तडजोड होत नसल्याने २१६ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. १९ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, १०१ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर चालू वर्षात ५१५ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील ७६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे. तडजोड होत नसलेली ३१ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत, तर १२ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, ३९७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेसंशयी वृत्ती, व्यसनाधीनता, वाढलेला मोबाईलचा वापर, सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे, हुंड्याची मागणी, प्रॉपर्टीचा वाद, शेतजमिनीचे कारण, सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद वाढले आहेत. विशेषत: मोबाईलचा अतिवापर हा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र भरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येत आहे.

४८९ प्रकरणांत समेटभरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींनुसार माहेर- सासरच्या मंडळींसह दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेल्या संसारात पुन्हा हास्य फुलविण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करतात. गत दोन वर्षांमध्ये भरोसा सेलकडून ४८९ प्रकरणांत आपापसात तडजोड करण्यात आली आहे.

मोबाईलचा वापर, संशयीवृत्ती, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत असल्याचे आमच्याकडे दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येते. तक्रार दाखल झाल्यानंतर दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.- एस.बी. राठोड, भरोसा सेलप्रमुख

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाFamilyपरिवार