शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडिया, मोबाईलमुळे पती-पत्नीमध्ये वाढती भांडणे; भरोसा सेलमधील तक्रारीमधून उघड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:40 IST

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्दे व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद

जालना : मोबाईलवर तास तास बोलणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वाढलेला वापर पती-पत्नींमधील भांडणाला फोडणी टाकत आहे. गत दोन वर्षांत भरोसा सेलमध्ये तब्बल १२६४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामोपचारानंतरही समेट घडत नसल्याने त्यातील २४७ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस दलांतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये गत काही वर्षांपासून पती-पत्नींमध्ये होणाऱ्या वादाच्या तक्रारी दाखल होण्याचे  प्रमाण वाढले आहे. व्यसनाधीनता, संशयी वृत्तीसह मोबाईलचा अतिवापर पती-पत्नींमधील वादाचे प्रमुख कारण ठरत आहे. येथील भरोसा सेलमध्ये सन २०१९ मध्ये ७४९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पैकी ४१३ प्रकरणांत समोपचारानंतर आपापसात तडजोड करण्यात आली. तडजोड होत नसल्याने २१६ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली. १९ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, १०१ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर चालू वर्षात ५१५ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील ७६ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली आहे. तडजोड होत नसलेली ३१ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत, तर १२ प्रकरणांत कोर्ट समन्स देण्यात आले असून, ३९७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेसंशयी वृत्ती, व्यसनाधीनता, वाढलेला मोबाईलचा वापर, सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणे, हुंड्याची मागणी, प्रॉपर्टीचा वाद, शेतजमिनीचे कारण, सासू-सासऱ्यांपासून अलिप्त राहण्याची मागणी यासह इतर विविध कारणांनी पती-पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद वाढले आहेत. विशेषत: मोबाईलचा अतिवापर हा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र भरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येत आहे.

४८९ प्रकरणांत समेटभरोसा सेलमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींनुसार माहेर- सासरच्या मंडळींसह दाम्पत्यांमध्ये चर्चा घडवून आणली जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेल्या संसारात पुन्हा हास्य फुलविण्याचे काम अधिकारी, कर्मचारी करतात. गत दोन वर्षांमध्ये भरोसा सेलकडून ४८९ प्रकरणांत आपापसात तडजोड करण्यात आली आहे.

मोबाईलचा वापर, संशयीवृत्ती, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत असल्याचे आमच्याकडे दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येते. तक्रार दाखल झाल्यानंतर दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.- एस.बी. राठोड, भरोसा सेलप्रमुख

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाFamilyपरिवार