शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

नऊ महिन्यात आढळले उच्च रक्तदाबाचे सहा हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ...

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना तालुक्यात सर्वाधिक १६८४ रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयांतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी आजाराचे रुग्ण शोधून त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात. चालू वर्षातील नऊ महिन्यात उच्च रक्तदाबाचे तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबड तालुक्यात ४२०, बदनापूर तालुक्यात ९६२, भोकरदन तालुक्यात १३०, घनसावंगी तालुक्यात ८५१, जाफराबद तालुक्यात ८११, जालना तालुक्यात १६८४, मंठा तालुक्यात ८४८ तर परतूर तालुक्यात ४१२ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची शासकीय रुग्णालयामार्फत नियमित तपासणी सुरू असून, मोफत औषधांचेही वाटप केले जात आहे. वाढणारे उच्च रक्तदाबाचे रुग्ण पाहता नागरिकांनी स्वत:च्या हृदयाची अधिक काळजी घेण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

मधुमेहाचे २८९५ रुग्ण

जिल्ह्यात चालू वर्षात आजवर मधुमेहाचेही २८९५ रुग्ण आढळून आले आहेत. यात अंबड तालुक्यात ४२५, बदनापूर ३१५, भोकरदन ६३, घनसावंगी ४४३, जाफराबाद ४०९, जालना ७१५, मंठा ३४५ आणि परतूर तालुक्यात १८० रुग्ण आढळून आले आहेत. वाढणारा मधुमेहाचा आजारही सर्वसामान्यांसाठी घातक असाच आहे.

ही आहेत कारणे

अनुवंशिक होणारा आजार

वाढलेली धावपळ आणि मानसिक ताण

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन, मिठाचा अतिरिक्त वापर

अपुऱ्या प्रमाणात होणारी झोप

मद्यपान, धूम्रपानासह इतर व्यसने

कमी होणारी शारीरिक हलचाल, वाढलेले वजन

अशी आहेत लक्षणे

डोके जड होणे

कमीत कमी हालचालीत थकवा जाणवणे

अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे, छातीत धडधड करणे, मळमळ, उलटी आदी.

अशी घ्या काळजी

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थ कमी खावेत

नियमित व्यायाम करावा

पुरेशी झोप घ्यावी

मिठाचा प्रमाणात वापर करावा

वाढलेले वजन कमी करावे

जेवणात पालेभाज्यांचा वापर करावा

मानसिक तणाव कमी करावेत

वेळेवर उपचार घ्यावेत.

कोट

धावपळीच्या जीवनात जीवनशैलीत झालेला बदल हा उच्च रक्तदाब होण्यास अधिक कारणीभूत आहे. हा आजार होऊ नये यासाठी आहार, वजनावर नियंत्रण ठेवण्यासह मानसिक तणाव कमी करणे गरजेचे आहे. शिवाय हृदयाशी संबंधित कोणताही त्रास होत असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

डॉ. अर्चना भोसले

जिल्हा शल्यचिकित्सक.