शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात आढळले उच्च रक्तदाबाचे सहा हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ...

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना तालुक्यात सर्वाधिक १६८४ रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयांतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी आजाराचे रुग्ण शोधून त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात. चालू वर्षातील नऊ महिन्यात उच्च रक्तदाबाचे तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबड तालुक्यात ४२०, बदनापूर तालुक्यात ९६२, भोकरदन तालुक्यात १३०, घनसावंगी तालुक्यात ८५१, जाफराबद तालुक्यात ८११, जालना तालुक्यात १६८४, मंठा तालुक्यात ८४८ तर परतूर तालुक्यात ४१२ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची शासकीय रुग्णालयामार्फत नियमित तपासणी सुरू असून, मोफत औषधांचेही वाटप केले जात आहे. वाढणारे उच्च रक्तदाबाचे रुग्ण पाहता नागरिकांनी स्वत:च्या हृदयाची अधिक काळजी घेण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

मधुमेहाचे २८९५ रुग्ण

जिल्ह्यात चालू वर्षात आजवर मधुमेहाचेही २८९५ रुग्ण आढळून आले आहेत. यात अंबड तालुक्यात ४२५, बदनापूर ३१५, भोकरदन ६३, घनसावंगी ४४३, जाफराबाद ४०९, जालना ७१५, मंठा ३४५ आणि परतूर तालुक्यात १८० रुग्ण आढळून आले आहेत. वाढणारा मधुमेहाचा आजारही सर्वसामान्यांसाठी घातक असाच आहे.

ही आहेत कारणे

अनुवंशिक होणारा आजार

वाढलेली धावपळ आणि मानसिक ताण

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन, मिठाचा अतिरिक्त वापर

अपुऱ्या प्रमाणात होणारी झोप

मद्यपान, धूम्रपानासह इतर व्यसने

कमी होणारी शारीरिक हलचाल, वाढलेले वजन

अशी आहेत लक्षणे

डोके जड होणे

कमीत कमी हालचालीत थकवा जाणवणे

अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे, छातीत धडधड करणे, मळमळ, उलटी आदी.

अशी घ्या काळजी

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थ कमी खावेत

नियमित व्यायाम करावा

पुरेशी झोप घ्यावी

मिठाचा प्रमाणात वापर करावा

वाढलेले वजन कमी करावे

जेवणात पालेभाज्यांचा वापर करावा

मानसिक तणाव कमी करावेत

वेळेवर उपचार घ्यावेत.

कोट

धावपळीच्या जीवनात जीवनशैलीत झालेला बदल हा उच्च रक्तदाब होण्यास अधिक कारणीभूत आहे. हा आजार होऊ नये यासाठी आहार, वजनावर नियंत्रण ठेवण्यासह मानसिक तणाव कमी करणे गरजेचे आहे. शिवाय हृदयाशी संबंधित कोणताही त्रास होत असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

डॉ. अर्चना भोसले

जिल्हा शल्यचिकित्सक.