शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात आढळले उच्च रक्तदाबाचे सहा हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ...

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना तालुक्यात सर्वाधिक १६८४ रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयांतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी आजाराचे रुग्ण शोधून त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात. चालू वर्षातील नऊ महिन्यात उच्च रक्तदाबाचे तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबड तालुक्यात ४२०, बदनापूर तालुक्यात ९६२, भोकरदन तालुक्यात १३०, घनसावंगी तालुक्यात ८५१, जाफराबद तालुक्यात ८११, जालना तालुक्यात १६८४, मंठा तालुक्यात ८४८ तर परतूर तालुक्यात ४१२ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची शासकीय रुग्णालयामार्फत नियमित तपासणी सुरू असून, मोफत औषधांचेही वाटप केले जात आहे. वाढणारे उच्च रक्तदाबाचे रुग्ण पाहता नागरिकांनी स्वत:च्या हृदयाची अधिक काळजी घेण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

मधुमेहाचे २८९५ रुग्ण

जिल्ह्यात चालू वर्षात आजवर मधुमेहाचेही २८९५ रुग्ण आढळून आले आहेत. यात अंबड तालुक्यात ४२५, बदनापूर ३१५, भोकरदन ६३, घनसावंगी ४४३, जाफराबाद ४०९, जालना ७१५, मंठा ३४५ आणि परतूर तालुक्यात १८० रुग्ण आढळून आले आहेत. वाढणारा मधुमेहाचा आजारही सर्वसामान्यांसाठी घातक असाच आहे.

ही आहेत कारणे

अनुवंशिक होणारा आजार

वाढलेली धावपळ आणि मानसिक ताण

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन, मिठाचा अतिरिक्त वापर

अपुऱ्या प्रमाणात होणारी झोप

मद्यपान, धूम्रपानासह इतर व्यसने

कमी होणारी शारीरिक हलचाल, वाढलेले वजन

अशी आहेत लक्षणे

डोके जड होणे

कमीत कमी हालचालीत थकवा जाणवणे

अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे, छातीत धडधड करणे, मळमळ, उलटी आदी.

अशी घ्या काळजी

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थ कमी खावेत

नियमित व्यायाम करावा

पुरेशी झोप घ्यावी

मिठाचा प्रमाणात वापर करावा

वाढलेले वजन कमी करावे

जेवणात पालेभाज्यांचा वापर करावा

मानसिक तणाव कमी करावेत

वेळेवर उपचार घ्यावेत.

कोट

धावपळीच्या जीवनात जीवनशैलीत झालेला बदल हा उच्च रक्तदाब होण्यास अधिक कारणीभूत आहे. हा आजार होऊ नये यासाठी आहार, वजनावर नियंत्रण ठेवण्यासह मानसिक तणाव कमी करणे गरजेचे आहे. शिवाय हृदयाशी संबंधित कोणताही त्रास होत असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

डॉ. अर्चना भोसले

जिल्हा शल्यचिकित्सक.