शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
5
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
6
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
7
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
8
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
9
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
10
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
11
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
12
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
13
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
15
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
16
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
17
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
18
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
19
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
20
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात आढळले उच्च रक्तदाबाचे सहा हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ...

जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना तालुक्यात सर्वाधिक १६८४ रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.

जिल्हा रुग्णालयांतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी आजाराचे रुग्ण शोधून त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात. चालू वर्षातील नऊ महिन्यात उच्च रक्तदाबाचे तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबड तालुक्यात ४२०, बदनापूर तालुक्यात ९६२, भोकरदन तालुक्यात १३०, घनसावंगी तालुक्यात ८५१, जाफराबद तालुक्यात ८११, जालना तालुक्यात १६८४, मंठा तालुक्यात ८४८ तर परतूर तालुक्यात ४१२ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची शासकीय रुग्णालयामार्फत नियमित तपासणी सुरू असून, मोफत औषधांचेही वाटप केले जात आहे. वाढणारे उच्च रक्तदाबाचे रुग्ण पाहता नागरिकांनी स्वत:च्या हृदयाची अधिक काळजी घेण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

मधुमेहाचे २८९५ रुग्ण

जिल्ह्यात चालू वर्षात आजवर मधुमेहाचेही २८९५ रुग्ण आढळून आले आहेत. यात अंबड तालुक्यात ४२५, बदनापूर ३१५, भोकरदन ६३, घनसावंगी ४४३, जाफराबाद ४०९, जालना ७१५, मंठा ३४५ आणि परतूर तालुक्यात १८० रुग्ण आढळून आले आहेत. वाढणारा मधुमेहाचा आजारही सर्वसामान्यांसाठी घातक असाच आहे.

ही आहेत कारणे

अनुवंशिक होणारा आजार

वाढलेली धावपळ आणि मानसिक ताण

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन, मिठाचा अतिरिक्त वापर

अपुऱ्या प्रमाणात होणारी झोप

मद्यपान, धूम्रपानासह इतर व्यसने

कमी होणारी शारीरिक हलचाल, वाढलेले वजन

अशी आहेत लक्षणे

डोके जड होणे

कमीत कमी हालचालीत थकवा जाणवणे

अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे, छातीत धडधड करणे, मळमळ, उलटी आदी.

अशी घ्या काळजी

बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थ कमी खावेत

नियमित व्यायाम करावा

पुरेशी झोप घ्यावी

मिठाचा प्रमाणात वापर करावा

वाढलेले वजन कमी करावे

जेवणात पालेभाज्यांचा वापर करावा

मानसिक तणाव कमी करावेत

वेळेवर उपचार घ्यावेत.

कोट

धावपळीच्या जीवनात जीवनशैलीत झालेला बदल हा उच्च रक्तदाब होण्यास अधिक कारणीभूत आहे. हा आजार होऊ नये यासाठी आहार, वजनावर नियंत्रण ठेवण्यासह मानसिक तणाव कमी करणे गरजेचे आहे. शिवाय हृदयाशी संबंधित कोणताही त्रास होत असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.

डॉ. अर्चना भोसले

जिल्हा शल्यचिकित्सक.