शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके सुकली; अस्वस्थ शेतकऱ्याने २५ एकर सोयाबीन पिकावर फिरवले रोटाव्हिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 19:10 IST

Rain Delay : विहीर कोरडीठाक पडल्याने सोयाबीनला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

ठळक मुद्देपावसाने उघडीप दिल्याने सध्या पिके सुकून चालली आहे. शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट उभे राहिले आहे.

- हुसेन पठाणआन्वा (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे पावसाअभावी सुकून चाललेल्या २५ एकरातील सोयाबीन पिकावर शेतकऱ्याने मंगळवारी रोटाव्हिटर फिरवून पीक उद्ध्वस्त केले आहे.

आन्वा पाडा शिवारात जूनच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला. या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड केली. येथील बबन देशमुख यांनी आन्वा पाडा शिवारातील गट नंबर ३८२ मध्ये २५ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पीकही चांगले आले. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पीक सुकू लागले. विहीर कोरडीठाक पडल्याने सोयाबीनला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. चातकासारखी ते पावसाची वाट पाहत होते. परंतु, महिना उटलूनही पाऊस न पडल्याने सोयाबीनच्या पिकाने माना टाकल्या. शेवटी मंगळवारी त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने २५ एकरातील सोयाबीन पिकावर रोटव्हिटर फिरवले.

आन्वा परिसरात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आन्वा, आन्वा पाडा, कोदा, कारलावाडी, जानेफळ गायकवाड, वाकडी, कोकडी आदी भागांतील शेतकऱ्यांनी बॅंकेडून पीककर्ज घेऊन बी-बियाणे खरेदी केले. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सध्या पिके सुकून चालली आहे. शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट उभे राहिले आहे.

अडीच लाख रुपयांचा खर्चबबन देशमुख यांना २५ एकर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च आला होता. यात बी-बियाणे, खते व पेरणीसाठी लागलेल्या खर्चाचा समावेश आहे. त्यांनी एका बॅंकेकडून पीककर्ज काढून बी-बियाणे व खत खरेदी केले होते. आता हा खर्च कसा काढावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच मी २५ एकरात सोयाबीन पेरली. त्यानंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पीकही चांगले आले होते. परंतु, गेल्या २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकाने माना टाकल्या आहे. त्यामुळे रोटव्हिटर फिरवून सोयाबीनचे पीक काढून टाकले.- बबन देशमुख, शेतकरी, आन्वा पाडा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालनाRainपाऊस