शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पदोन्नती मिळाली त्याच दिवसापासून एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; जालन्यात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 12:56 IST

बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून, त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे.

जालना : जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बुधवारी रात्रीपासून अचानक गायब झाले आहेत. मित्राला भेटण्यास जात असल्याचे सांगून ते रात्री घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, बाहेर पडताना त्यांनी मोबाईल, वाहन असे काहीही सोबत नेले नव्हते. एसीबीचे वरिष्ठ अधिकारी जालन्यात तळ ठोकून असून कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. 

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे काल बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे पत्नीस सांगून घराबाहेर पडले होते. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन आणि खिशातील वॉच पाकीटही सोबत नेलेले नाही. याबाबत माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे हे गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते.

एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे व बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची गुरुवारी रात्री उशिरा पत्नीच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे. ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून, त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी