शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:10 IST

केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक महापालिका तसेच अ वर्ग नगर पालिकेने त्यांच्या हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक महापालिका तसेच अ वर्ग नगर पालिकेने त्यांच्या हद्दीतून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जालना पालिकेने जागा निश्चित केली होती. परंतु या जागेचा वाद न्यायालयात पोहोचल्याने हा प्रकल्प आता न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.केंंद्र सरकारच्या स्वच्छ शहर याजने अंतर्गत महापालिका तसेच अ वर्ग दर्जाच्या पालिकेने शहरातून वाहणारे सांडपाणी थेट नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करूनच ते सोडावे असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्यानुसार विशेष निधी देखील देऊ केला आहे. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकल्प जालना पालिकेने उभारावा यासाठी जागाही निश्चित केली आहे. परंतु जी जागा पालिकेने निश्चित केली आहे, त्या जागेवर शेजारील खासगी व्यक्तीने हक्क सांगून हे प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे. त्यावर पुढील महिन्यात सुनावणी होणार असून, त्या नंतरच या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार आहे.दरम्यान सामनगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे काम अद्यापही कासवगतीने सुरू असून, शहरातील संपूर्ण कचरा एकत्रित करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती तसेच अन्य साहित्य उत्पादन करण्यासाठी पूर्वी पुणे येथील एका खाजगी कंपनीला हे कंत्राट दिले होते. परंतु या कंपनीने प्रकल्प पूर्ण होण्या आधीच लाखो रूपयांचे बिल उचलून घेतले. नंतर या कंपनीला पालिकेने दंडही आकारला होता. परंतु नंतर हा प्रकल्प या ना त्या कारणाने रखडत गेला आहे.दरम्यान जालना शहरातील डम्पिंग ग्राऊंड असलेल्या रोहनवाडी मार्गावरील कचºयाचे ढीग कमी करण्यासाठी आता पालिकेने पुढकार घेतला असून, तेथे कच-याचे विलगीकरण करण्यासाठी चार कोटी रूपयांचा निधी मंजूर करून त्या कचऱ्यांची विल्हेवाट लावली जात आहे.औद्योगिक वसाहत : स्वतंत्र पुनर्वापर प्रकल्पजालन्यात स्टील उद्योग असल्याने त्या उद्योगाला दररोज कोट्यवधी लिटर पाणी लागते. हे पाणी आणताना उद्योजकांचा मोठा खर्च होता. यामुळे काही उद्योजकांनी पाण्याचे रिसायकलिंग करून त्याचा पुनर्वापर करणे यापूर्वीच सुरू केले आहे. परंतु सर्व उद्योगांना सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना देण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारणीचे प्रयत्न मध्यंतरी उद्योजक आणि पालिकेकडून सुरू होते. ते प्रयत्न देखील सध्या थंड बस्त्यात पडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदGarbage Disposal Issueकचरा प्रश्नgovernment schemeसरकारी योजना