शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:29 IST

जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली.

ठळक मुद्देसंतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. रेशीम कोष निर्मितीमधून एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

- विष्णू वाकडे जालना : जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली. यातून त्यांना एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

संतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात रेशीम उदयोगाचे प्रशिक्षण घेऊन शेतात तुतीची लागवड केली. त्यांना याचा चांगलाच फायदा झाला असून, त्यांनी एकाच वर्षांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. संतोष कचरे यांनी आक्टोबर २०१६ मध्ये २० बाय ५० चे शेड उभारून  अडीच एकर तुतीची लागवड केली. शेतातील विहिरीत जेमतेम पाणी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन केले. यामुळे तुतीला कमी प्रमाणात पाणी लागले.

कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी तुतीला खते, औषधी वापरली. त्यामुळे मालही चांगला आला.  त्यानंतर जुलै २०१७ मध्ये पहिले पीक काढण्यात आले. आणि यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यांनी २०१७-१८  मध्ये सातत्याने रेशीम कोष उत्पादनासाठी अकरा पिके घेतली. प्रत्येक  टप्प्यातून त्यांना सरासरी पावणे दोन क्विंटलपर्यंत रेशीम कोष मिळाले. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील रामनगरमध्ये वर्षभरात अकरा वेळा कोष विक्री केली. यामधून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रत्येक टप्प्यासाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. यातून त्यांनी सात लाखांचा निव्वळ नफा मिळविला. त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी व जगदीश प्रसाद भूतडा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

रेशीम कोष व्यवसायात  २९ दिवस परीश्रम घ्यावे लागतात. यावेळी आपण फक्त अळी संगोपनावर लक्ष दिले. शेडसाठी आपणास अनुदानही मिळाले नाही. तरीही योग्य पध्दतीने खर्च करून रेशी शेती साकारली असल्याचे शेतकरी सतोष कचरे यांनी सांगितले.योग्य व्यवस्थापन करून रेशीम कोष निर्मिती व्यवसायात येणाऱ्या शेतकऱ्यांनी तुतीच्या कडीची लागवडी करण्याऐवजी रोपे लावून तुती वाढविली. यामध्ये तुतीचा पाला महत्तवाचा असतो, असे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी यांनी संगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा