शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
2
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
3
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
4
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
5
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
6
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
7
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
8
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
9
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
10
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
11
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
12
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
13
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
14
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
15
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
16
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
17
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
18
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
19
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
20
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम कोष निर्मितीतून वर्षात घेतले सात लाखांचे उत्पन्न; अत्यल्प पाण्याचे नियोजन ठरले फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:29 IST

जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली.

ठळक मुद्देसंतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. रेशीम कोष निर्मितीमधून एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

- विष्णू वाकडे जालना : जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष कचरे यांनी रेशीम उद्योग शेतीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतात रेशीम कोष निर्मिती केली. यातून त्यांना एका वर्षात जवळपास सात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

संतोष कचरे यांच्याकडे केवळ अडीच एकर शेती आहे. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात रेशीम उदयोगाचे प्रशिक्षण घेऊन शेतात तुतीची लागवड केली. त्यांना याचा चांगलाच फायदा झाला असून, त्यांनी एकाच वर्षांत लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. संतोष कचरे यांनी आक्टोबर २०१६ मध्ये २० बाय ५० चे शेड उभारून  अडीच एकर तुतीची लागवड केली. शेतातील विहिरीत जेमतेम पाणी असल्याने त्यांनी ठिबक सिंचन केले. यामुळे तुतीला कमी प्रमाणात पाणी लागले.

कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी तुतीला खते, औषधी वापरली. त्यामुळे मालही चांगला आला.  त्यानंतर जुलै २०१७ मध्ये पहिले पीक काढण्यात आले. आणि यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यांनी २०१७-१८  मध्ये सातत्याने रेशीम कोष उत्पादनासाठी अकरा पिके घेतली. प्रत्येक  टप्प्यातून त्यांना सरासरी पावणे दोन क्विंटलपर्यंत रेशीम कोष मिळाले. त्यानंतर त्यांनी बंगळूर येथील रामनगरमध्ये वर्षभरात अकरा वेळा कोष विक्री केली. यामधून त्यांना ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रत्येक टप्प्यासाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च आला. यातून त्यांनी सात लाखांचा निव्वळ नफा मिळविला. त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी व जगदीश प्रसाद भूतडा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

रेशीम कोष व्यवसायात  २९ दिवस परीश्रम घ्यावे लागतात. यावेळी आपण फक्त अळी संगोपनावर लक्ष दिले. शेडसाठी आपणास अनुदानही मिळाले नाही. तरीही योग्य पध्दतीने खर्च करून रेशी शेती साकारली असल्याचे शेतकरी सतोष कचरे यांनी सांगितले.योग्य व्यवस्थापन करून रेशीम कोष निर्मिती व्यवसायात येणाऱ्या शेतकऱ्यांनी तुतीच्या कडीची लागवडी करण्याऐवजी रोपे लावून तुती वाढविली. यामध्ये तुतीचा पाला महत्तवाचा असतो, असे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. अजय मिटकरी यांनी संगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा