शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:59 IST

गुरूवारी गणेश विसर्जन मिरवणुका निघणार असून, या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गुरूवारी गणेश विसर्जन मिरवणुका निघणार असून, या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यासह ९० अधिकारी व ९०७ कर्मचारी तैनात राहणार आहेत. शिवाय होमगार्डसह विशेष पथकेही कार्यरत राहणार आहेत.गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस दलाच्या वतीने ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच दिवस-रात्रीची गस्तही वाढविण्यात आली होती. गुरूवारी श्रींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ६६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ९०७ पोलीस कर्मचारी यात ८६८ पुरूष व १०३ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय ४२६ होमगार्ड, ४७ महिला होमगार्ड व एसआरपीच्या दोन प्लेटून तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय साध्या गणवेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथकेही बंदोबस्तकामी तैनात करण्यात आली आहेत. शिवाय विसर्जन मिरवणूक मार्गावर फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. स्वयंसेवी कार्यकर्ते यांचीही या कामी मदत घेतली जाणार आहे.४४ वाहने दिमतीलामिरवणुका शांततेत व्हाव्यात, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय अतिरिक्त ४४ वाहनेही बंदोबस्त कामी अधिकारी, कर्मचा-यांच्या दिमतीला राहणार आहेत.सूचनांचे पालन करावेगणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मिरवणुकांसाठी वाहतूक मार्गात तात्पुरते बदलशिवाजी पुतळा ते गरीबशहा बाजार,फूलबाजार ते काद्राबाद मस्जिद, सावरकर चौक ते महावीर चौक या मार्गावरील वाहतूक १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक शिवाजी पुतळा, नरहरी चौक, जेईएस कॉलेज, बुंदेले चौक, सोमेश टेम्पो, बाबूराव काळे चौक, मुर्गी तलाव, सूर्या हॉटेल, जुना मोंढा व बसस्थानक मार्गाने वळविण्यात आली आहे.फूलबाजार ते अकेली मस्जिद, शोला चौक ते सदर बाजार जालना, बडी सडक या मार्गावरील वाहतूक दुपारी ३ वाजता बंद होणार आहे. ही वाहतूक जेईएस कॉलेज, मुर्गी तलाव, शिवाजी प्रेस, जुना मोंढा, बसस्थानक मार्गे वळविण्यात आली आहे.मुर्गी तलाव ते राम मंदिर ते शिवाजी चौक या मार्गावरील वाहतूक सायंकाळी ६ वाजता बंद केली जाणार आहे. ही वाहतूक जेईएस कॉलेज, मुर्गी तलाव, जुना मोंढा व बसस्थानक मार्गे वळविण्यात आली आहे.अंबड चौफुली ते सिटीजन टी पॉइंट या मार्गावरील वाहतूक सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत बंद केली जाणार आहे. ही वाहतूक भोकरदन चौफुली, कन्हैय्या नगर, मंठा चौफुली या मार्गावरून वळविण्यात आली आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Jalna Policeजालना पोलीसroad transportरस्ते वाहतूकGanpati Festivalगणेशोत्सव