शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धुरकटले शहर, गुदमरला श्र्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:29 IST

बियाणे, स्टीलची राजधानी म्हणून नाव लौकिक असलेल्या जालन्याने प्रदूषणातही आघाडी घेतली आहे. ही बाब जालनेकरांची चिंता वाढवणारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बियाणे, स्टीलची राजधानी म्हणून नाव लौकिक असलेल्या जालन्याने प्रदूषणातही आघाडी घेतली आहे. ही बाब जालनेकरांची चिंता वाढवणारी आहे. धूलिकणांपासून संरक्षण करण्यासाठी आता मुलींप्रमाणेच माणसांनाही दुचाकीवरून जाताना तोंडाला रूमाल बांधणे आवश्यक बनले आहे. एकीकडे उद्योगांनी येथे मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या कारखान्यातून निघालेल्या धुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे निकष घालून दिले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचा दावा जालना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके यांनी नमूद केले आहे.जालन्यात केवळ उद्योगाच्या धुरातूनच प्रदूषण होत नसून, मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून बाद झालेल्या रिक्षा तसेच अन्य वाहनांची जालन्यात राजरोसपणे चलती आहे. त्यातच इंधनातील भेसळ हा देखील प्रदूषण वाढीत महत्वाचा घटक ठरत आहे. त्यातच सुरू असलेली बांधकामे, रस्त्यावरील धूळ आणि कुठल्याही कामासाठी खोदण्यात येत असलेला रस्ता यातून धुळीचे प्रमाण जालन्यात क्षमतेपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा कचरा पेटवून दिल्याने देखील धुराचे लोट उठतात. या धूळ आणि धुरामुळे मानवाच्या श्वसन प्रक्रियेवरच हल्ला होतो. धुळीचे कण अतिसूक्ष्म असल्याने ते तोंडाला रूमाल बांधूनही फुफ्फुसात जातात. त्यामुळे शरीराची मोठी हानी होते. ही हानी होत असताना ती अत्यंत मंद गतीने त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे हाच एक यावरील प्रभावी इलाज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.काळजी घेणे हेच आपल्या हाती४शहरातील विविध भागांत सुरू असलेली बांधकामे ही अविरत सुरू राहणार आहेत. तसेच उद्योग म्हटल्यावर त्यातून धूर हा निघणारच आहे. परंतु हे सर्व होत असताना जालन्यातील धुळीचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सर्व काही सरकार करेल ही भूमिका चुकीची आहे. जालन्यातील प्रदूषणात नायट्रोजन आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड मोठ्या प्रमाणावर वातावरणात पसरत आहे. त्याचे अतिसूक्ष्म कण हे मानवी शरीरात केव्हा प्रवेश करतात हे समजतही नाही. त्यामुळे प्रदूषणापासून वाचण्यासाठी सरकारसह नागरिकांनी देखील कमीतकमी अस्वच्छता पसरविण्याची गरज आहे. वृक्षारोपणाच्या नावाखाली केवळ दिखावा न करता त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उद्योगांसोबतच वृक्षांचे तेवढे आच्छादनही महत्त्वाचे ठरते. - डॉ. राजेश सेठिया, जालनाकारखान्यांनी उपाययोजना केल्या४जालन्यात स्टील तसेच अन्य उद्योग आहेत. त्यातून निघणारा धूर हा उंच चिमणीव्दारे आकाशात सोडण्यात येतो. त्यासाठी आवश्यक त्या सूचना सर्व कारखान्यांना दिल्या असून, त्यांनी ते निकष पाळले आहेत का, याची तपासणी केली जाते, त्यात निकष पाळले असल्यासच त्यांना कारखाना चालविण्याची परवानगी देण्यात येते. येथील बहुतांश कारखान्यांनी याचे पालन केले आहे. शहरातील वाढती धूळ कमी करण्यासाठी जालना पालिकेला सूचना दिल्या असून, लवकरच कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. - व्ही.पी. शेळके,उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जालना,उपाय योजनांची गरजशहरात प्रदूषण असल्यामुळे तोंडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच न.पच्यावतीने कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, शहरातील नागरिकच या गाड्यांमध्ये कचरा टाकत नाही. नागरिकांनी जागृत होऊन कचरा गाड्यांमध्ये टाकावा. व नगर परिषदेने प्रदूषणासाठी उपाय योजना राबव्यात.- नारायण शेळके, विद्यार्थीन.प.ने लक्ष द्यावेशहरातील औद्योगिक वसाहत परिसरात सांयकाळी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. या परिसरातून सांयकाळी येतांना श्वास घेण्यासही अडचण येते. यावर उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने झाडांची लागवड करण्यात यावी. जेणेकरुन काही प्रमाणात तरी प्रदूषण कमी होईल. तसेच शहरातील नागरिकांनी जागृत होऊन प्रदूषणाविरोध रस्त्यावर उतरले पाहिजे.- सोनाली कोलते, विद्यार्थिंनीनागरिकांचे आरोग्य धोक्यातजालना शहराची अवस्था बिकट असून, शहरातील रस्त्यावरुन चालतांना तोडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे. शहरात काही महिन्यापूर्वीच रस्ते तयार करण्यात आले. परंतु, रस्त्यावरील धूळ मात्र तशीच आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष असलेल्या प्रशासने लक्ष देण्याची गरज आहेत.- शिवानी सिरसाट, विद्यार्थिनीश्वास घेण्यास त्रासशहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होतो. प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्याला व्हावा.- सुरज धबडकर, नागरिक

टॅग्स :pollutionप्रदूषणroad transportरस्ते वाहतूकenvironmentवातावरण