शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाढीव मदत मिळाल्यासच समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:33 AM

तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : कापसाच्या काड्या झाल्या, सोयाबीन गेले, मका गेला, हातात काहीच आलं नाही. शासनाने तोकडी मदत दिली. साहेब अडचणींचा डोंगर आहे. तुम्ही आता तरी वाढीव मदत द्या, अशी आर्त हाक कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी रविवारी नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला घातली.तालुक्यातील कडेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका, सोयाबीन, कापूस, बाजरी आदी विविध पिकांची पाहणी केली व शेतक-यांसमवेत संवाद साधला़ यावेळी या पथकाने गट नं २० मधील रामेश्वर बळीराम लहाने यांच्या शेतात मका पिकाची पाहणी केली. मक्याला अतिवृष्टीमुळे कोंब फुटले, पीक सडले. पिकासाठी एक लाखाचे पीककर्ज काढून खर्च केल्याचे संबंधित शेतक-याने सांगितले. येथील गट नं. १९ मधील धोंडीबा पांडुरंग जाधव यांच्या शेतातील कापूस, बाजरी या पिकांची पाहणी केली़ यावेळी या अतिवृष्टीमुळे कापसाच्या कवड्या झाल्या असून, या कापसाची वेचणीही करता येत नाही. बाजरीसुध्दा खराब झाल्याने हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी सांगितले़ यावेळी संगीता रमेश कान्हेरे या शेतकरी महिलेने अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाल्याचे सांगत शासनाने दिलेली ८ हजार रूपये हेक्टर म्हणजे सुमारे ३ हजार रू प्रती एकर ही मदत कमी आहे. यात आम्ही केलेला खर्चही निघत नाही. आमचे कर्जही तसेच असून, आम्हाला भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित अनेकांनी शेतक-यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या.या पथकात डॉ व्ही. थिरूपाज, डॉ. के. मनोहरण यांच्यासह जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी