शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
11
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
12
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
13
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
14
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
15
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
16
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
17
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
18
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
19
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
20
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला

आमदारांसमोर सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:59 IST

रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जालना मतदार संघातील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, पं.स. सभापती, उपसभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य यांच्यासह सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.यावर्षी जालना तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. परंतु, तरीही तालुक्यातील काही गावांना मार्चनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण आज ही बैठक बोलवली असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. त्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांकडून गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. काही सरपंचांनी ग्रामसेवकांनी बैठकीची पूर्वकल्पना दिली नसल्याचे सांगितले. या मुद्यांवरून त्यांनी संबंधित ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले.त्यानंतर प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी पाणीटंचाईची माहिती दिली. पाईपलाईन दुरूस्ती, हातपंप दुरूस्ती, बोअरची दुरुस्ती, पाणीटंचाई निवारणार्थ बोअर, विहीर घेणे, रोहित्र उपलब्ध करून देणे, विहिरींचा गाळ काढणे आदी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या आढावा बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महावितरणच्या अधिका-यांची उडाली भंबेरीजालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु, रोहित्र नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्र्माण होत आहे. रोहित्र नसणे, रोहित्रावर लोड येणे, पोल खराब होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून, ज्या गावांना रोहित्राची गरज आहे. तेथे तातडीने रोहित्र देण्यात यावे, अशी मागणी काही सरपंचांनी केली. याबाबत आ. गोरंट्याल यांनी महावितरणच्या अधिका-याला विचारले असता, उत्तर देताना अधिका-याची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर आ. गोरंट्याल यांनी ज्या गावांना रोहित्राची गरज आहे, त्या गावांना तातडीने रोहित्र देण्याचे सांगितले.कडवंचीला करणार मॉडर्न व्हिलेजजालना तालुक्यातील कडवंची हे गाव जगाच्या नकाशावर आहे. या गावाला भेट देण्यासाठी नेहमी देशभरातील लोक येतात. परंतु, या गावाला जाणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील पूलही मोडकळीस आला आहे. या पुलाच्या कामाचे अनेक वेळा नारळ फोडण्यात आले. परंतु, अद्यापही पुलाचे काम झाले नाही. कडवंची हे आदर्श गाव आहे. त्यामुळे या गावाला आपण येणा-या काळात मॉर्डन व्हीलेज करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंचांसह पदाधिका-यांनी गावा- गावातील समस्याही यावेळी मांडल्या.

टॅग्स :MLAआमदारJalna z pजालना जिल्हा परिषदsarpanchसरपंचwater shortageपाणीकपातcivic issueनागरी समस्या