शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांसमोर सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:59 IST

रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रोहित्र नसल्यामुळे विद्युतपंप बंद असणे, गावातील पाईपलाईन दुरूस्त न करणे, हातपंपाची दुरूस्ती न करणे आदी कारणांवरून आमदार कैलास गोरंट्याल यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जालना मतदार संघातील सरपंच व ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, पं.स. सभापती, उपसभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य यांच्यासह सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.यावर्षी जालना तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. परंतु, तरीही तालुक्यातील काही गावांना मार्चनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी आपण आज ही बैठक बोलवली असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. त्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांकडून गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. काही सरपंचांनी ग्रामसेवकांनी बैठकीची पूर्वकल्पना दिली नसल्याचे सांगितले. या मुद्यांवरून त्यांनी संबंधित ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले.त्यानंतर प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवकांनी पाणीटंचाईची माहिती दिली. पाईपलाईन दुरूस्ती, हातपंप दुरूस्ती, बोअरची दुरुस्ती, पाणीटंचाई निवारणार्थ बोअर, विहीर घेणे, रोहित्र उपलब्ध करून देणे, विहिरींचा गाळ काढणे आदी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या आढावा बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.महावितरणच्या अधिका-यांची उडाली भंबेरीजालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु, रोहित्र नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्र्माण होत आहे. रोहित्र नसणे, रोहित्रावर लोड येणे, पोल खराब होणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून, ज्या गावांना रोहित्राची गरज आहे. तेथे तातडीने रोहित्र देण्यात यावे, अशी मागणी काही सरपंचांनी केली. याबाबत आ. गोरंट्याल यांनी महावितरणच्या अधिका-याला विचारले असता, उत्तर देताना अधिका-याची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर आ. गोरंट्याल यांनी ज्या गावांना रोहित्राची गरज आहे, त्या गावांना तातडीने रोहित्र देण्याचे सांगितले.कडवंचीला करणार मॉडर्न व्हिलेजजालना तालुक्यातील कडवंची हे गाव जगाच्या नकाशावर आहे. या गावाला भेट देण्यासाठी नेहमी देशभरातील लोक येतात. परंतु, या गावाला जाणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील पूलही मोडकळीस आला आहे. या पुलाच्या कामाचे अनेक वेळा नारळ फोडण्यात आले. परंतु, अद्यापही पुलाचे काम झाले नाही. कडवंची हे आदर्श गाव आहे. त्यामुळे या गावाला आपण येणा-या काळात मॉर्डन व्हीलेज करणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सरपंचांसह पदाधिका-यांनी गावा- गावातील समस्याही यावेळी मांडल्या.

टॅग्स :MLAआमदारJalna z pजालना जिल्हा परिषदsarpanchसरपंचwater shortageपाणीकपातcivic issueनागरी समस्या