शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सचिन मोरे यांना सरपंच आॅफ द इयर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:07 IST

यंदाचा सरपंच आॅफ द इयरचा पुरस्कार गोलापांगरीचे सरपंच सचिन प्रल्हादराव मोरे यांना प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डचे सोमवारी दुपारी शहरातील मधुर बॅक्वेट हॉलमध्ये थाटात वितरण झाले. यंदाचा सरपंच आॅफ द इयरचा पुरस्कार गोलापांगरीचे सरपंच सचिन प्रल्हादराव मोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गावाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या १२ सरपंचांनाही गौरविण्यात आले.गाव करी तो राव काय करी..अशी एक म्हण आहे. जर गावाने ठरवले तर त्या गावाचा विकास कोणीच रोखू शकत नाही. परंतु हा विकास करताना कोणीतरी कप्तान हवा असतो. आणि गावाचा कप्तान म्हणजे त्या गावाचा सरपंच असतो. १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायत सदस्यांना महत्व प्राप्त झाले आहे. वित्त आयोगाचा निधी आता थेट त्या ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत आहे. यामूळे जिल्हा परिषदेपेक्षाही ग्रामपंचायतीला महत्व प्राप्त झाले आहे. आणि त्यातच सरपंचाचे महत्वही यामुळे वाढले असून, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.आधुनिकीकरण होत असताना खेडी ओस पडत आहे. शेतीची अवस्था बिकट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचाही मोठा फटका जनजीवनावर झाला आहे. विकास करतांना आपले मूळ जपणेही आवश्यक असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.लोकमत, बीकेटी आणि पतजंलीतर्फे आयोजित सरपंच अवॉर्ड वितरणाचे हा रंगारंग कार्यक्रम सोमवारी पार पडला. येणाऱ्याचे स्वागत तुतारीच्या निनादाने आणि औक्षण करून केले जात होते. येणा-या प्रत्येक सरपंचाच्या चेह-यावर एक वेगळाच उत्साह दिसून आला. प्रारंभी लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रास्तविक केले. त्यांनी या सरपंच अवार्डचे महत्व विशद करून सांगितले आणि लोकमतने हा उपक्रम कशामुळे सुरू केला याची माहिती दिली. या पुरस्कार सोहळ्यात महिला सरपंचानीही बाजी मारल्याचे दिसून आले. महिलांच्या सहभागाबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात येत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फळबाग तज्ज्ञ तथा गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, कृषीभूषण उध्दव खेडेकर, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सीताबाई मोहिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापुरकर, जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केलीे. यावेळी औरंगाबाद येथील इव्हेंट विभागाचे तनुजा भालेराव, शैलेश देशमुख, अभय भोसले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद टोणपे, नरेश कोरडे, संतोष मापारी, गजानन वानखडे, दीपक ढोले, विकास व्होरकटे, बाळासाहेब सुतार, गुलाब साळुंके, रवी आंबेकर, जिया सौदागर, शरद घुले, नागेश बरसाले आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Lokmat Eventलोकमत इव्हेंट