शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

सचिन मोरे यांना सरपंच आॅफ द इयर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:07 IST

यंदाचा सरपंच आॅफ द इयरचा पुरस्कार गोलापांगरीचे सरपंच सचिन प्रल्हादराव मोरे यांना प्रदान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डचे सोमवारी दुपारी शहरातील मधुर बॅक्वेट हॉलमध्ये थाटात वितरण झाले. यंदाचा सरपंच आॅफ द इयरचा पुरस्कार गोलापांगरीचे सरपंच सचिन प्रल्हादराव मोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गावाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या १२ सरपंचांनाही गौरविण्यात आले.गाव करी तो राव काय करी..अशी एक म्हण आहे. जर गावाने ठरवले तर त्या गावाचा विकास कोणीच रोखू शकत नाही. परंतु हा विकास करताना कोणीतरी कप्तान हवा असतो. आणि गावाचा कप्तान म्हणजे त्या गावाचा सरपंच असतो. १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायत सदस्यांना महत्व प्राप्त झाले आहे. वित्त आयोगाचा निधी आता थेट त्या ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत आहे. यामूळे जिल्हा परिषदेपेक्षाही ग्रामपंचायतीला महत्व प्राप्त झाले आहे. आणि त्यातच सरपंचाचे महत्वही यामुळे वाढले असून, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.आधुनिकीकरण होत असताना खेडी ओस पडत आहे. शेतीची अवस्था बिकट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचाही मोठा फटका जनजीवनावर झाला आहे. विकास करतांना आपले मूळ जपणेही आवश्यक असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.लोकमत, बीकेटी आणि पतजंलीतर्फे आयोजित सरपंच अवॉर्ड वितरणाचे हा रंगारंग कार्यक्रम सोमवारी पार पडला. येणाऱ्याचे स्वागत तुतारीच्या निनादाने आणि औक्षण करून केले जात होते. येणा-या प्रत्येक सरपंचाच्या चेह-यावर एक वेगळाच उत्साह दिसून आला. प्रारंभी लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रास्तविक केले. त्यांनी या सरपंच अवार्डचे महत्व विशद करून सांगितले आणि लोकमतने हा उपक्रम कशामुळे सुरू केला याची माहिती दिली. या पुरस्कार सोहळ्यात महिला सरपंचानीही बाजी मारल्याचे दिसून आले. महिलांच्या सहभागाबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात येत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फळबाग तज्ज्ञ तथा गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, कृषीभूषण उध्दव खेडेकर, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सीताबाई मोहिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापुरकर, जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केलीे. यावेळी औरंगाबाद येथील इव्हेंट विभागाचे तनुजा भालेराव, शैलेश देशमुख, अभय भोसले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद टोणपे, नरेश कोरडे, संतोष मापारी, गजानन वानखडे, दीपक ढोले, विकास व्होरकटे, बाळासाहेब सुतार, गुलाब साळुंके, रवी आंबेकर, जिया सौदागर, शरद घुले, नागेश बरसाले आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :Lokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्Lokmat Eventलोकमत इव्हेंट