सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:07+5:302021-02-10T04:31:07+5:30
जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्तीसह इतर प्रक्रिया ...

सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर
जालना : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्तीसह इतर प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीतील बहुमताने विजयी पॅनलच्या प्रमुखांनी सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी दक्षता घेत नियोजन केल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, १० फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवडणूक होणार आहे. तर १२ फेब्रुवारीला शुक्रवारी उर्वरित ३७ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये अंतरवाला, घाणेवाडी, लोंढ्याचीवाडी, पाचनवडगाव, सारवाडी, हिस्वन खुर्द, हिस्वन बुद्रुक, पुणेगाव, इस्लामवाडी, पोकळवडगाव, जामवाडी, कुंबेफळ, कचरेवाडी, खरपुडी, दरेगाव, देवमूर्ती, बोरगाव हिवर्डी, तांदूळवाडी खुर्द, गोंदेगाव, खणेपुरी, उटवद, थेरगाव, मानेगाव, जहागीर, दहिफळ, जळगाव सोमनाथ, निरखेडा, धानोरा, हस्तेपिंपळगाव, शिवणी, राठोडनगर, डांबरी कोळवाडी, शंभू सावरगाव, सावंगी तलाव, हातवन, सेवली, धारकल्याण, वानडगाव, पीरकल्याण, भाटेपुरी, इंदेवाडी, बाजिउम्रद, वझर घोडेगाव, निधोना आणि सिंधीकाळेगाव
या ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर १२ फेब्रुवारी रोजी दुधनाकाळेगाव, बठाण बुद्रुक, विरेगाव, माळशेंद्रा, कडवंची, वडगाव, बापकळ, सिरसवाडी, पोखरी शिंगाडे, घेटुळी उखळी, काकडा निपाणीपोखरी, नसडगाव पाथ्रुड, वरखेड, नेर, ममदाबाद, भिलपुरी खुर्द, मौजपुरी, वडीवाडी, वखारी, हिवरा रोषणगाव, सामनगाव, धांडेगाव, गुंडेवाडी, वंजारउमरद, पळसखेडा, तांदुळवाडी बुद्रुक, गोलापांगरी, पारेगाव, रेवगाव, माळेगाव खुर्द, सोमनाथ जळगाव, रोहनवाडी, बेथलम, कारला आणि चितळीपुतळी या ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड होणार आहे.
गाव विकासाचे आव्हान
ग्रामीण भागात आजही बहुतांश समस्या असून, स्वच्छता, आरोग्य, बेरोजगारी आदी एक ना अनेक प्रश्न गावागावात आहेत. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांसमोर हे प्रश्न सोडविण्याचे आव्हान राहणार आहे. त्यात महिलांशी निगडित गावपातळीवरील समस्यांचाही डोंगर उभा आहे. त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांसमोर या समस्या सोडविण्याचे आव्हान राहणार आहे.