शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नळणीच्या तरुणाने केली ‘भोंगा’ मध्ये भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:45 IST

कोणाचे नशीब केव्हा बदलेल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग भोकरदन तालुक्यातील नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरुणाच्या बाबतीत घडला तो दिग्दर्शकाच्या एका फोनमुळे ! त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘भोंगा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती़

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : कोणाचे नशीब केव्हा बदलेल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग भोकरदन तालुक्यातील नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरुणाच्या बाबतीत घडला तो दिग्दर्शकाच्या एका फोनमुळे ! त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘भोंगा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती़नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरूणाचे शिक्षण सिल्लोड येथे झाले. बीएससी झाल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न त्याच्या समोर होता. मात्र, सुरुवातीपासून काही तरी करण्याची त्याची धडपड होती. त्यामुळे त्याने फोटोग्राफी सुरू केली. यातून एका चॅनलमध्ये त्याला नोकरी मिळविली. मात्र, त्या ठिकाणी त्याचे मन रमत नव्हते, दरम्यान त्याची काही सिनेअभिनेत्यांशी ओळख झाली. सिनेसृष्टीचा लळा लागला असला तरी ग्रामीण भागातून आलेल्या तरूणाला संधी कशी मिळणार, हा प्रश्न होता. अविनाशने खचून न जाता मेहनतीने तयारी केली. सुरूवातीला चित्रपटामध्ये केवळ फोटोग्राफी करण्याचे काम मिळाले, पुढे त्याला ‘ड्रामा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, शिवाय त्याने ‘समर्थ’ हा चित्रपट प्रदर्शित केला. त्यानंतर ‘संघर्ष’ नाटकात काम मिळाले. या नाटकाला २००७ मध्ये राज्य नाट्यस्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळाला. मात्र, पुन्हा कामाची संधी मिळेल की नाही, या चिंतेने कोलते गावाकडे आला होता.अविनाश, तू आहे त्याच परिस्थितीत मालेगावला येमार्च २०१८ मध्ये तो भोकरदन येथे आलेला असताना ‘भोंगा’ चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटम पाटील यांचा अविनाशला फोन आला. अविनाश, तू आहे त्याच परिस्थितीत (मालेगाव, जि. नाशिक) येथे ये. कोलते तेथे जाण्यापूर्वी सिनेमात काम करणारी टीम तेथे हजर होती. यानंतर सर्व जण (मांढुरणी, ता. मालेगाव) येथे गेले आणि ‘भोंगा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. यात अविनाशने नाम्याची भूमिका चांगल्या प्रकारे केली. यामुळे दिग्दर्शकाने त्याच्या पाठीवर थाप मारली. यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढे हा सिनेमा चांगला चालला होता आणि नुकताच या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे.फोनमुळे संधी मिळालीअत्यंत खडतर प्रवास करून मला सिनेमात केवळ फोटो काढण्याच्या कामाची संधी मिळाली होती. दरम्यान ‘भोंगा’ चे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केलेल्या एका फोनमुळे मला ’भोंगा’ चित्रपटात ‘नाम्या’ ची भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचा खूप आनंद झाला असल्याचे अविनाश कोलते याने सांगितले.

टॅग्स :cinemaसिनेमाNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018marathiमराठीartकला