शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

परतीच्या पावसाचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:06 IST

बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / भोकरदन : बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. भोकरदन तालुक्यातील बेलोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची एक बाजू पाण्यामुळे वाहून गेली आहे. तर जालना शहराला पाणीपुरवठा करणाºया घाणेवाडी प्रकल्पात ६ फुटांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला.जिल्ह्यात गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भोकरदन तालुक्यातील केळना, पूर्णा, गिरजा, रायघोळ, धामणा, जुई या सर्व नद्यांना पूर आला होता. तर बेलोरा येथील बंधा-याला सिंचन विभागाने गेट टाकलेले आहेत. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा बंधारा एका बाजूने वाहून गेला. त्यामुळे येथील शेतकरी दशरथ श्रीपत कोल्हे यांचे अर्धा एकर शेती वाहून गेली. तसेच गजानन सुखदेव कोल्हे, पंजाब सारंगधर बदर, रमेश शिंदे या तीन शेतकऱ्यांच्या बंधा-याच्या लगत नदीच्या काठावर असलेल्या विहिरी गाळामुळे गायब झाल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे १२ ते १५ लाख रूपयाचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.अभियंत्यांनी केली पाहणीबेलोरा बंधारा वाहून गेल्याची माहिती जलसंधारण विभागाचे उपअभियंता आऱ के़जाधव, अंबादास सहाने यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बेलोरा येथे जाऊन पाहणी केली.या मंडळांत झाली अतिवृष्टीजालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळात ८४ मिमी, विरेगाव ९४ मिमी, पचनवडगाव ६५ मिमी, वाघ्रूळ जहागीर ११० मिमी, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी ८० मिमी, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार ९५ मिमी, राजूर ७९ मिमी, केदारखेडा ८१ मिमी, अनवा १३० मिमी, परतूर महसूल मंडळात ७८ मिमी तर अंबड, वडीगोद्री महसूल मंडळात ९८ मिमी पाऊस झाला.‘खडकपूर्णा’तून ५८ हजार क्युसेसचा विसर्गतळणी : विदर्भातील खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आले असून, पूर्णा नदीपात्रात ५८ हजार ३१३ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक वाढल्याने मंठा तालुक्यातील पूर्णा नदीवरील पूर्णा पाटी, वझर सरकटे व उस्वद येथील कोल्हापुरी बंधा-यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बंधा-याच्या बाजूचा भराव वाहून जाण्याबरोबर शेतात पाणी घुसून शेतजमीन व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तिन्ही बंधा-यांची पाटबंधारे व मंठा तहसीलच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाहणी केल्याचे उस्वद येथील माजी सरपंच राम चट्टे, वामन देशमुख, संतोष सरकटे, अशोक सरकटे यांनी सांगितले.जामवाडीनजीकच्या पुलाचा सापळा गेला वाहूनजालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी गावाजवळील हॉटेल युवराज जवळ नव्यानेच एक पूल बांधण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या पुलाचा सापळा वाहून गेला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे जालना ते देऊळगावराजा या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नंतर सिंदखेड राजा आणि भोकरदन मार्गे वळविण्यात आली. पूल वाहून गेल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाडेकर यांनी जिल्हा प्रशासनाला कळविली. त्यानंतर खबरदारी घेण्यात आली.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी : बंधा-यावरील २० गेट काढलेकेदारखेडा : येथील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा मंगळवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाला. पाण्याचा वेग वाढल्याने बंधा-याचे पाणी शेजारील शेतशिवारात गेले. त्यामुळे या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. बंधा-याच्या पाण्याची धार नदीकाठावरील पंढरीनाथ तांबडे यांच्या शेतातून पडल्याने कपाशीसह जमिनीतील माती वाहून गेली.याची दखल घेत जलसंधारण खात्याच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी केदारखेडा कोल्हापुरी बंधा-याचे २० गेट काढले होते. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या बंधा-याची पाहणी केली. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर.के.जाधव, अंबादास सहाने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरDamधरणagricultureशेती