शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ग्राहकां अभावी जालना मोंढ्यातील उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:21 PM

बाजारगप्पा : दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते.

- संजय देशमुख (जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मका आणि नवीन तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. असे असले तरी बाजारातील चैतन्य लोप पावले आहे. कुक्कुटपालन व्यवसाय आणि स्टार्च उद्योगासाठी लागणारा मका जवळपास ३ हजार पोती बाजारात येत आहे. साखरेला मागणी असली तरी साखरेचे भाव स्थिर आहेत.

मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मात्र, दुष्काळी छायेमुळे बाजारपेठेत जेमतेम ग्राहकी असल्याचे दिसून येते. अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन, तूर तसेच मका मोंढ्यातील रस्त्यांवर वाळत घातली असून, चाळणीद्वारे त्यातील काडी- कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे. साखरेचा कोटा संबंधित कारखान्यांना विक्रीसाठी शासनाने ठरवून दिला होता. तो कोटा विक्री झाला आहे. कोटा विक्री होत असल्याने साखरेला मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी आजही साखर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ३ हजार २०० च्या पुढे सरकण्यास तयार नाही. आता केंद्र सरकार नवीन कोटा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करणार असल्याने त्याकडे साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे डोळे लागून आहेत. 

दरम्यान, कुठल्याच मालाला तेजी नसल्याने पूर्वीप्रमाणे व्यापारी हे जेवढा माल लागतो तेवढाच खरेदी करीत आहेत. साठवणूक करून तो दडवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या फंदात आता धान्याचे दलालदेखील पुढे येत नसल्याचे सांगण्यात आले. जालना बाजारपेठेत मोसंबीची आवकही नगण्य झाली आहे.  गेल्या आठवड्यात जिल्ह्यात धुके पडल्याने द्राक्ष बागांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मका, सोयाबीन, तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. तुरीचे भाव हे ४५००  ते ४७०० रुपये क्विंटल आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे मालाची खरेदी करण्यासाठी नाफेडने सहा खरेदी केंद्रे सुरू केली होती. मात्र त्या केंद्रांवरील खरेदी आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने रविवारपासून ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदी केंद्रावर २० डिसेंबरपर्यंत केवळ १ हजार ५५५ क्विंटल उडीद, मूग आणि सोयाबीनची आवक झाली होती. कमी पावसाचा फटका मूग, उडीद आणि सोयाबीनलाही बसल्याने ही आवक कमी झाली आहे. दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात जालना, भोकरदन, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी आणि परतूर ही सहा खरेदी केंदे्र सुरू केली होती. त्यात उडदासाठी ३८३, मूग १ हजार १०७, सोयाबीन ७४८, अशी एकूण २ हजार २१९ क्विंटलची नोंदणी करण्यात आली होती. खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर १३८ शेतकऱ्यांनी उडीद ४४८, मूग ८८६ क्विंटल अशी एकूण ६०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

नवीन गुळाची आवक जालना बाजारपेठेत बऱ्यापैकी असून, तीन ते साडेतीन हजार गुळाच्या भेली येत आहेत. आता फेडरेशनकडून तूर खरेदीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, अद्याप त्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी