शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

पाच गावांत होणार फेरमूल्यांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:37 AM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जालना तालुक्यातील पाच गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन होणार आहे. बाजार भावापेक्षा कमी दर मिळाल्याचे सांगत या गावातील शेतक-यांनी महामार्गासाठी जमीन संपादनास विरोध केला आहे.समृद्धी महामार्गासाठी जालना तालुक्यातील आंबेडकरवाडी, निधोना, गुंडेवाडी, तांदुळवाडी, जामवाडी, पानशेंद्रा, अहंकार देऊळगाव, नंदापूर, थार, कडवंची या गावांमधील जमिनीचे संपादन केले जाणार आहे. पैकी थेट वाघाटाघाटीने जमीन खरेदीसाठी सर्व गावांमधील जमिनीचे दर प्रशासनाने जाहीर केले आहे. दर जाहीर झाल्यानंतर अनेक शेतक-यांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण झाले असून, शेतक-यांना मोबदलाही देण्यात आला आहे.मात्र, आंबेडकरवाडी, निधोना, तांदूळवाडी, गुंडेवाडी व जामवाडी येथील शेतक-यांनी दर निश्चित समितीने जाहीर केलेला प्रतिहेक्टरी दराऐजवी प्रती चौरस मीटर दराने वाढीव मोबदल्याची मागणी केली आहे. या गावांमधील जमीन शहरालगत असून, अकृषक क्षेत्राला लागून आहे. त्यामुळे शहरी भागातल्या जमिनीप्रमाणे बाजार भावाच्या चार पट मोबदला मिळावा, अशी मागणी या भागातील शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे आंबेकरवाडी, जामवाडी येथील एकाही शेतक-याने अद्याप समृद्धीसाठी जमीन दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी आंबेडकरवाडी येथे संयुक्त मोजणीसाठी गेलेल्या पथकाला शेतक-यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह रस्ते विकास महामंडळासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. जमिनीला प्रति चौरस मीटर दर देण्याची शेतकºयांची मागणी अव्यवहार्य असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, मार्चअखेर समृद्धी महामार्गासाठीच्या जमिनीचे संपादन करावयाचे असल्याने प्रशासनाने या गावांमधील जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास या तिन्ही गावातील जमिनीचे नवे दर निश्चित करून त्याची माहिती गावातील ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.जामवाडी, गुंडेवाडी, तांदुळवाडी गावांमधील समृद्धीसाठी संपादित करावयाच्या जिरायती जमिनीसाठी एकरी १५ लाख, हंगामी बागायती जमिनीसाठी २० लाख व बागायती जमिनीसाठी ३० लाखांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, जालना बाजार समितीला लागून असलेल्या गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील जमिनीला प्रती चौरस मीटरचा दर द्यावा, अशी मागणी शेतक-यांमधून केली जात आहे. शेतक-यांच्या याच मागणीसाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंत्रालयात रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेतली. शेतक-यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या होत्या.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र