शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:52 AM

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करता यावी यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवी यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम राबविले जातात. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला आहे. सलग चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे पावसाचे पडलेले पाणी, जमिनीत जिरवून भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात कायदा केला. याबाबत नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचना नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत. हार्वेस्टिंग केल्याशिवाय बांधकामास परवानगी देऊ नये अशा नगरविकास खात्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र, या चांगल्या उपक्रमाविषयी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याच पुनर्भरण होत नसल्याने शहरातील जुन्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.कूपनलिकांचे पाणी खोलवर गेल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. साडेतीन लाखापेक्षा जास्त शहराची लोकसंख्या आहे. नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला आहे. तर जायकवाडी धरणातून नवीन शहरासाठी येणारे पाणी सुध्दा पंधरा दिवसानंतर एकदा येते. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागात पाण्याची टंचाई निर्माण होते.ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा, रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागते. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल.जलनपुनर्भरणामुळे होणारे फायदेयोग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते.तसेच जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणा-या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीमध्ये जिरविले गेलेले पाणी शेतीच्या कामी वापरले जाऊ शकते. विशेषत: कमी पाऊस झाल्यास, किंवा ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ह्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच गुरांना, जनावरांना पाजण्यासाठी देखील हे पाणी वापरले जाऊ शकते. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी पाण्याची मागणी देखील वाढत आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाण्याची गरज भागविण्याकरिता बोअरवेल्स खणल्या जात आहेत. परिणामी, जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. जर पावसाचे पाणी जमिनीखाली जिरवणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषदRainपाऊस