शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

‘समृद्धी’च्या मोबदल्यातून कर्जाची वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:01 AM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशेतक-यांमध्ये नाराजीचा सूर : नागपूर- मुंबई महामार्गासाठी ४५० हेक्टर जमिनीचे संपादन होणार

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.बदनापूर व जालना तालुक्यातील २५ गावांमधील एक हजार १५४ शेतकºयांची सुमारे साडेचारशे हेक्टर जमीन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये जालना तालुक्यातील ७११, तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतकºयांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकार देळगाव, नंदापूर, थार या गावांमधील १०४ खरेदीखत पूर्ण झाले असून, ५१.९६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे.बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी, गेवराई बाजार या गावामधील ८१ खरेदीखत पूर्ण झाले असून, त्यापोटी ४१.१३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. दोन्ही तालुके मिळून ९६९ खरेदीखतांच्या माध्यमातून ३४७.१० हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे ३५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. समृद्धीसाठी जमीन विक्री केलेल्या बहुतांश शेतकºयांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचे कृषी कर्ज असून, काही शेतकºयांनी दीर्घ मुदतीचे कर्जही घेतलेले आहे. समृद्धीचा मोबदला शेतकºयांना देताना बँकेचे थकीत कर्ज कपात करून उर्वरित रक्कम शेतकºयांच्या हातावर ठेवली जात आहे. त्यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.कर्जमाफीच्या लाभाबाबत संभ्रम !समृद्धी महामार्गात ज्या शेतकºयांची जमीन जात आहे. त्यातील बहुतांश शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र आहेत.मात्र, काही शेतकºयांची जमीन समृद्धीसाठी खरेदी करतानाच बँकेचे पूर्ण कर्ज कपात करण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास या शेतकºयांना पैसे परत करू, असे सांगण्यात येत आहे. मात्र, एकदा बँकेचे कर्ज फेडल्यास परत कर्जमाफीचा लाभ मिळेला का, याबाबत शेतकºयांध्ये संभ्रम आहे.