शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पावसाचा महाविक्रमी वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:44 AM

देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ४९ महसूल मंडळात एकाचवेळी अतिवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देव अर्थात भगवान असेलच तर त्याच्या घरी देर है..पर अंधेर नही.. अशी म्हण प्रचलित आहे. याचा प्रत्यय जालना जिल्ह्यात गुरूवारी जालनेकरांना आला. गुरूवारी सकाळ पासून सुरू झालेल्या पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक वर्षाव केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील एकूण ४९ महसूल मंडळात एकाचवेळी अतिवृष्टी होण्याची ही पहिलीच वेळ असावी.दीड महिन्याच्या खंडा नंतर गुरूवारी पावसाचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले. गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण पावसाची सरासरी ही २३६ मिलिमीटर एवढीच होती. तर ही पावसाची सरासरी शुक्रवारी सकाळी ८ वाजता चक्क ३४९ मिलिमीटरवर पोचली. त्यामुळे २४ तासात जालना जिल्ह्यात ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. महसूल मंडळात पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा आहे.जालना १३२.६३, बदनापूर १४२.६०, भोकरदन ८८.८६, जाफराबाद ९३.८०, परतूर १३४.२०, मंठर ११६, अंबड ७७.२९ आणि घनसावंगी १२३.५७ असा एकूण ११३.६३ मिलिमीटर पाऊस गुरूवारी रात्री पडला. जो एक विक्रमी पाऊस म्हणून याची जिल्ह्यात नोंद झाली आहे. या पावसासुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व नदी, नाले ओथंबून वाहिले. दीड महिन्याच्या खंडा नंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने मूग, तूर, कपाशी, मका आणि सोयाबीन पिकांना जीवनदान मिळाले आहे. मध्यंतरी कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार जालना जिल्हा दुष्काळाच्या गडद छाायेत गेला होता.त्यामुळे येथील महसूल प्रशासनाने खरिप हंगामातील नुकसानीचे पंचनामे करावेत की, काय येथपर्यंत विषय पोहोचला होता. पावसाचा खंड आणि त्यातच कपाशीवर झालेला बोंडअळीचा हल्ला यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला होता. जालना जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये बोंडअळीचा हल्ला झाल्याचा अहवाल कृषी विभागाने वरिष्ठांना दिला आहे. आता हा पाऊस पडल्याने कपाशीचे उत्पन्न घटले तरी, सोयाबीन आणि तुरीच्या माध्यमातून होणारे हे नुकसान भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018