शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

रावसाहेब दानवे-सत्तारांमध्ये पुन्हा गुप्तगू; अंबादास दानवेंनी घेतली जालन्यात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:44 IST

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक २० दिवसांवर येऊन ठेपली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असतांना भाजप-शिवसेना युतीकडून औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागून आहे.औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात गेल्या काही वर्षामध्ये उमेदवार हा औरंगाबाद जिल्ह्यातून लादलेला आहे. त्यामुळे यंदा जालना जिल्ह्यातून काँग्रेसने उमेदवार द्यावा अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून होत आहे. गेल्या निवडणुकीत अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेला.या मतदारसंघात ६१६ मतदार आहेत. भाजपा -सेनेचे ३०० च्या जवळपास मतदार असून, कॉग्रेस व राष्ट्रवादीची २५१ च्या जवळपास मतदार आहेत तर एमआयएमची संख्या ही २७ असून, अन्य ४१ मतदार आहेत. दरम्यान कॉग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही महिन्यांपासून युतीशी सलगी केल्यामुळे त्यांची मते काँग्रेसकडे जाणार की, युतीकडे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.विद्यमान आमदार सुभाष झांबड निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात असले तरी अद्याप त्यांनी त्याचे पत्ते खुले केले नाहीत. काँग्रेसकडून अंबडचे बाबुराव कुळकर्णी, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच कन्नडचे संतोष कोल्हे यांच्या नावाची चर्चा आहे.भोकरदन तालुक्यात नगरपरिषद व जिल्हापरिषद मिळून ३० मतदार आहेत. त्यापैकी नगरपरिषदेत काँग्रेसकडे ११ तर राष्ट्रवादीकडे ४ व भाजपाकडे ४ मतदार आहेत तर जिल्हा परिषदेत भाजपकडे ८ व शिवसेनेकडे २ तर राष्ट्रवादीकडे १ मतदार आहे.राजकीय वर्तुळात चर्चासिल्लोडचे आ. सत्तार यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी हे दोनच नेते उपस्थित होते. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील दोघांनीही उघड केला नाही. विशेष म्हणजे आ. सत्तार यांचे पुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना या मतदारसंघातून उमेदवारीबाबत चर्चा झाली असावी असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दरम्यान शनिवारी युतीचे संभाव्य उमेदवार अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री दानवेंची जालन्यात भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Abdul Sattarअब्दुल सत्तारRaosaheb Danweरावसाहेब दानवे