शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:13 IST

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्याचे राजकारण म्हटले की मिलीजुली सरकार, असा सर्वत्र समज पसरला आहे. आणि तो काही अंशी खरा देखील आहे. येथे कोणताच राजकारणी कोणाचे उणे-दुणे काढत नाही. जियो और जीने दो या तत्त्वानुसार जालन्याच्या राजकारणाची दिशा असल्याने अनेक महत्वाच्या मुद्यावर ना विरोधक सडकून टीका करत ना सत्ताधारी विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगत. त्यामुळे शहरातील कोट्यवधी रूपये खर्च होऊन सुरू असलेल्या कामांच्या दर्जावर त्याचा परिणाम सर्वसामान्यांना दिसतो. परंतु आपला मुद्दा उचलणारे नेतृत्व नसल्याने चलता है.. म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एक ते दीड तास जालन्यात आले होते. त्यांना दिल्लीला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी भाजपच्या सर्व नगरसेवकांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी जवळपास सर्व नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच गेल्या चार ते पाच वर्षात आपण विविध योजनेतून शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. परंतु काही नगरसेवकांनी हा निधी खर्च करतांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्याशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे.तसेच त्यांना हवे तसे प्रस्ताव तयार करून घेऊन निधी मिळवून घेतल्याचे आपल्या लक्षात आल्याचे दानवेंनी सांगत आपण गोट्या खेळत नसल्याचे सांगितले.एकूणच या दानवेंच्या रौद्र रूपाने नगरसेवकांना घाम न फुटल्यास नवल. पालिकेतील विविध मुद्यांवरून सध्या प्रश्न गाजत आहेत. या कडे लक्ष देण्यासह हे सर्व मुद्दे तयार करून घेऊन नगरविकास विभागाच्या सचिवांकडे ते द्यावेत जर त्यात काही गौडबंगाल असेल त्याची चौकशी आपण लावू, अशी स्पष्ट भूूमिकाही त्यांनी घेतली. विशेष म्हणजे जालन्याची नगर पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असल्याने युतीचे नेते अर्थात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दक्ष आहेत.खोतकर यांनी जालना पालिकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच नेते आपले अस्तित्व पणाला लावत असल्याचे दिसून येते. आपल्या अल्पशा विश्राम काळात केंद्रीय मंत्री जाम चिडल्याने नगरसेवकांमध्ये चर्चेला उधाण आले होते.विशेष म्हणजे, यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही दानवेंनी चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा भाजपमध्येच दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेJalana Muncipalityजालना नगरपरिषदPoliticsराजकारणBJPभाजपा