शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

राणी उंचेगावकरांच्या संभाषणामध्ये होतोय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे ...

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगावसह परिसरातील आठ गावांत विविध मोबाइल कंपन्यांचे १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. असे असतानाही एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होत आहे. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. अनेकवेळा संबंधित कंपन्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

माहिती आणि प्रसारणाच्या या युगात मोबाइल हे महत्त्वाचे साधन आहे. नागरिकांना शासकीय असलेल्या बीएसएनएलसह इतर कंपन्यांकडून सेवा दिली जाते. लोकांनी आपल्याच कंपनीला प्राधान्य द्यावे, यासाठी कंपन्यांकडून आकर्षक ऑफर दिल्या जातात, तसेच जाहिरातींद्वारे आमच्याचं कंपनीचे नेटवर्क चांगले असल्याचे दाखविले जाते. कंपन्यांच्या आकर्षक ऑफर व जाहिरातीमध्ये दाखविलेली नेटवर्कची सुविधा यामुळे बहुतांश लोक संबंधित कंपनीचे ग्राहक बनतात; परंतु ग्रामीण भागात गेल्यावर एकाही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे ग्राहकांचे संभाषण अडखळत होते.

घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरात बीएसएनएलचे एक व खासगी कंपनीचे एक असे दोन टॉवर आहेत. हे टॉवर्स असतानाही ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही. नेटवर्क मिळत नसल्याने राणी उंचेगावसह तळेगाव, भुतेगाव, दाई अंतरवाली, मानेपुरी, राठी अंतरवाली, शेवगळ, मुढेगाव या गावांतील नागरिक त्रस्त आहेत. अनेकवेळा संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नेटवर्क मिळत नसल्याने शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालये व बँकांचे कामकाज ठप्प झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्राहकांची होतेय लूट

कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. त्यानंतर ग्राहकाही एकदाच दोन ते तीन महिन्यांचे रिचार्ज टाकतात; परंतु नेटवर्क नसल्याने रिचार्जचा पुरेपूर वापर केला जात नाही. मुदत संपली की, कंपनी रिचार्ज परत घेते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागते.

गावामध्ये नेटवर्क नसल्याने संभाषणामध्ये अडथळ होतो. यामुळे ऑनलाइन कामकाजही ठप्प झाले आहे. ऑनलाइन काम करायचे असेल तर घनसावंगी किंवा जालना शहरात जावे लागते. याबाबत अनेकवेळा तक्रारी देखील करण्यात आल्या; परंतु काहीच फायदा झाला नाही. आमच्याकडे मोबाइल असून नसल्यासारखा झाला आहे.

गजानन मंडाळ, ग्रामस्थ, मानेपुरी