शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जालना जिल्ह्यात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये रंगतोेय खो-खो चा खेळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:04 IST

जालना जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत चोऱ्या. घरफोड्या तसेच खून, गोळीबाराचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने जालन्यातील पोलिसांची जरब संपली काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत चोऱ्या. घरफोड्या तसेच खून, गोळीबाराचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने जालन्यातील पोलिसांची जरब संपली काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे गुन्हे घडत असतांनाच पोलिस त्या प्रकरणातील आरोपींना अटक करत आहेत. त्यांच्याकडून पोलिसी खाक्या दाखवून दुसरे गुन्हेही उघडकीस आणत आहेत. परंतु चोºया, लूटमारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. अनेक मोठ्या चोऱ्यांचा तपास आजही लागलेला नसल्याचे वास्तवही नाकारून चालणार नाही. त्यामुळे जालन्यात चोर आणि पोलिसांमध्ये जणू काही एकमेकांना खो देण्याचा खेळ रंगत असल्याचे चित्र आहे.जालन्यात व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे हवालाच्या माध्यमातून होणारी देवाण-घेवाणही काही कोटींमध्येच असते. यातून व्यावसायिकांमधील स्पर्धा आणि एकमेकांविरूध्द असलेला रोष यातून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. तीन महिन्यापूर्वी शेलगाव येथे एका तरूणाचा गोळी घालून सायंकाळी खून करण्यात आला होता. त्यातील मुख्य आरोपीं पर्यत पोलीस पोहोचू शकले नाहीत. दरम्यान या खुनाची घटना शांत होते ना तोच व्यापारी सिंघवी यांच्यावर गोळीबार होतो, त्यातून ते बालंबाल बचावतात. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनच गौतम मुनोत यांना जिवे मारण्यासाठी दिलेल्या सुपारीचे प्रकरण समोर आले. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दलाने चांगली कामगिरी करून गावठी पिस्तूल तसेच काडतूस जप्त केले.हे सर्व होत असतानाच गुन्हे घडण्याचे प्रमाणमात्र पोलसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सदर बाजार पोलिस ठाण्याजवळील भरत पाटणी यांच्या घरी चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास जैसे थे आहे. हा तपास लावण्यासाठी पोलिसांकडून पाहिजे तसे प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी बुलडाणा पतसंस्थेतील कर्मचा-यांना मारहाण करून त्यांच्याकडील ३ लाख रूपये लुटण्याची घटना ही भर दिवसा घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच अवैध वाळूचे आव्हानही पोलीस आणि महसूल समोर निर्माण झालेले आहे.जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक एस.चैतन्य हे एक धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जात असतानाच त्यांच्याच काळात गुन्हे घडण्याचे प्रकारही वाढत आहेत. गुन्हे ज्या प्रमाणे वाढत आहेत ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण हे कागदावर सुरळीत असल्याचे दर्शविले जात असतानाच प्रत्यक्षात मात्र वेगळी स्थिती आहे. लहानमोठे भांडण ही तर जालन्यात नित्याचीच बाब झाली आहे.गस्त वाढवूनही गुन्ह्यांमध्ये वाढ कशी ?पोलिसांकडून शहर व जिल्ह्यात गस्त वाढवून गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आज जालना शहरासह ग्रामीण भागात चो-या, दरोड्यांचे प्रमाण कायम आहे.त्यामुळे गस्तीवर असलेले पोलिस कुठे कमी पडतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यातच पोलिसांकडील खब-यांचे जाळ कमी झाल्यानेही गुन्हेगारांची टीप मिळतांना यंत्रणेसमोर अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसCrime Newsगुन्हेगारी