शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पावसाळा संपत आला ३८ प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:03 IST

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परिणामी भर पावसाळ्यात शहरी, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे.जालना जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या २८४.४ मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्याची तीन महिने लोटत आली तरी मोठा पाऊस झालेला नाही. जालना तालुक्यात २३२ मिमी, बदनापूर- २७१ मिमी, भोकरदन- ३९६ मिमी, जाफराबाद- ३१८ मिमी, परतूर- २८१ मिमी, मंठा- २७५ मिमी, अंबड- २५२ मिमी, तर घनसावंगी तालुक्यात २४३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी आहे. मात्र, आजवर केवळ २८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याही मोठा पाऊस झालेला नाही. केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत.पैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक असून, चार प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर दोन प्रकलपांमध्ये ७६ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघू प्रकल्प आहेत. पैकी ३८ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत आहे. केवळ दोन प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणी असून, एका प्रकल्पात २६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.पावसाअभावी प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून, नदी-नालेही कोरडेठाक आहेत. प्रकल्पातच पाणी नसल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. गावा-गावातील पाणीप्रश्न कायम असून, टँकर, अधिग्रहणाद्वारे गावांची तहान भागविली जात आहे.मागील अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी रिमझिम पावसावर तग धरलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिप हंगामातील पिके धोक्यात आला असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प