शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपत आला ३८ प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:03 IST

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परिणामी भर पावसाळ्यात शहरी, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे.जालना जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या २८४.४ मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्याची तीन महिने लोटत आली तरी मोठा पाऊस झालेला नाही. जालना तालुक्यात २३२ मिमी, बदनापूर- २७१ मिमी, भोकरदन- ३९६ मिमी, जाफराबाद- ३१८ मिमी, परतूर- २८१ मिमी, मंठा- २७५ मिमी, अंबड- २५२ मिमी, तर घनसावंगी तालुक्यात २४३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी आहे. मात्र, आजवर केवळ २८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याही मोठा पाऊस झालेला नाही. केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत.पैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक असून, चार प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर दोन प्रकलपांमध्ये ७६ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघू प्रकल्प आहेत. पैकी ३८ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत आहे. केवळ दोन प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणी असून, एका प्रकल्पात २६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.पावसाअभावी प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून, नदी-नालेही कोरडेठाक आहेत. प्रकल्पातच पाणी नसल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. गावा-गावातील पाणीप्रश्न कायम असून, टँकर, अधिग्रहणाद्वारे गावांची तहान भागविली जात आहे.मागील अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी रिमझिम पावसावर तग धरलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिप हंगामातील पिके धोक्यात आला असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प