शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

पावसाळा संपत आला ३८ प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 01:03 IST

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जालना जिल्ह्यातील ६४ पैकी ३८ प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पांत मृत पाणीसाठा असून, जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. परिणामी भर पावसाळ्यात शहरी, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे.जालना जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या २८४.४ मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्याची तीन महिने लोटत आली तरी मोठा पाऊस झालेला नाही. जालना तालुक्यात २३२ मिमी, बदनापूर- २७१ मिमी, भोकरदन- ३९६ मिमी, जाफराबाद- ३१८ मिमी, परतूर- २८१ मिमी, मंठा- २७५ मिमी, अंबड- २५२ मिमी, तर घनसावंगी तालुक्यात २४३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी आहे. मात्र, आजवर केवळ २८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याही मोठा पाऊस झालेला नाही. केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान आजही कायम आहे. जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत.पैकी एक मध्यम प्रकल्प कोरडाठाक असून, चार प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर दोन प्रकलपांमध्ये ७६ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ५७ लघू प्रकल्प आहेत. पैकी ३८ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक आहेत. तर २१ प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत आहे. केवळ दोन प्रकल्पात ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणी असून, एका प्रकल्पात २६ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.पावसाअभावी प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट असून, नदी-नालेही कोरडेठाक आहेत. प्रकल्पातच पाणी नसल्याने अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. गावा-गावातील पाणीप्रश्न कायम असून, टँकर, अधिग्रहणाद्वारे गावांची तहान भागविली जात आहे.मागील अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी रिमझिम पावसावर तग धरलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील खरिप हंगामातील पिके धोक्यात आला असून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प