शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जालना जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:55 IST

शहरासह तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी दुपारी पावसाने समाधानकारक हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी दुपारी पावसाने समाधानकारक हजेरी लावली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत होती.चंदनझिरासह नागेवाडी, खादगाव, निधोना, दावलवाडी परिसरात मंगळवारी दुपारी प्रथमच मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर चांगला असल्याने सर्वत्र पाणीपाणी झाले होते. सत्यमनगर येथे पाण्याचे मोठे डबके साचले होते. या भागात यंदा एकही मोठा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पेरणी, लागवड रखडली होती. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.बदनापूर तालुक्यातील दावलवाडी, खादगाव, सेलगाव, नजीकपांगरी परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. सुरुवातीला पडलेल्या एका पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती. आता जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आजच्या मुसळधार पावसामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.माहोरा परिसरातही मंगळवारी दुपारी पावसाचे जोरदार आगमन झाले. या भागात प्रथमच दीड तास मोठा पाऊस झाला असून, बळीराजा सुखावला आहे. याशिवाय केदारखेडा, जळगाव सपकाळ, जामखेड, तळणी, जाफराबाद आदी परिसरातही मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली.भोकरदन तालुक्यातील आन्वासह कोदा, जानेफळ गायकवाड, वाकडी, कठोरा बाजार, केदारखेडा परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जुई नदीला चौथ्या वेळेस पूर आला. पुरामुळे नदीकाठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच पेरणी केलेले बियाणेही वाहून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.भोकरदन तालुक्यातील वडोद तागडा परिसरात दमदार पाऊस झाला. यामुळे रायगळ नदी पात्राजवळील शेतात पेरलेले सोयाबीन, कापूस, मका आदी पिकाचे नुकसान झाले. तसेच धामणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.राजूर परिसरात दोन दिवसांपासून संततधारराजूर : राजूरसह परिसरात गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, मंगळवारीही पावसाने समाधानकारक हजेरी लावली.मागील आठ दिवसांपूर्वी राजूरसह परिसरात पाऊस झाला होता. त्या पावसावर शेतक-यांनी खरिपाची लागवड, पेरणीची कामे उरकली. परंतू त्यानंतर पावसाने डोळे वटारल्याने शेतक-यांत धाकधुक होती.पावसाअभावी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. परंतू मंगळवारी दुपारी अर्धा तास संततधार पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.जालना-औरंगाबाद महामार्ग दीड तास ठप्पचंदनझिरा : मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नागेवाडी शिवारातील टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली होती. टोलनाका परिसरात असलेला नाला ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे टोलनाका परिसरातील दुभाजक पाण्याखाली आल्याने रस्ताच दिसत नसल्याने वाहतूक दीड तास ठप्प होती.भोकरदन तालुक्यात पावसाचा जोर कायमलोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरासह तालुक्यात मंगळवारीही दमदार पाऊस झाला. या पावसामुळे केळना जुई नद्यांना पूर आला होता. या पुरामुळे दानापूर येथील जुई धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच जुई नदीलाही पूर आला होता. नवे भोकरदन परिसरातील अनेकांच्या घरात पाणीही घुसले होते.जुई धरणाच्या मागच्या भागात वाकडी, आणवा, गोळेगाव, उंडनगाव, पणवदोद परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जुई नदीला मोठा पूर आला होता. या पुरामुळे जुई धरणातील पाणी पातळी वाढणार आहे. सध्या धरणात १२ फूट पाणी साठा आहे. धारण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ४ ते ५ फूट पाण्याची गरज आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर धरण भरण्यास मदत होणार आहे. शेलूद येथील धामना धरणाच्या वरच्या भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणी पातळी वाढणार आहे.दरम्यान, नवे भोकरदन परिसरात म्हाडा परिसरातून या दोन्ही नाल्यांमधून आलेले पाणी रफिक कॉलनी, हबीब कॉलनी परिसरातील अनेकांच्या घरात घुसले. त्यामुळे संबंधितांची चांगलीच तारंबळ उडाली होती. मुख्याधिकारी अमित सोंडगे यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी शौकत अली यांनी नाला खुला करून पाणी काढा अशी मागणी केली. या परिसरातील काही जणांनी दोन्ही बाजूचा नाला अरुंद केल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो आहे असे सांगितले. हा नाला खोल केला तरी आमच्या घरात पाणी येणार नाही, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली. यावेळी गजानन तांदुळजे, नगरसेवक कदिर शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलriverनदीDamधरण