शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

पावसाने भिंत कोसळून कुटुंब दबले; नातीचा मृत्यू तर आजी-आजोबा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 13:23 IST

२०१५ साली ढासला गावात महापुरामुळे जवळपास २५० घरे पडली होती.

बदनापूर ( जालना ) : तालुक्यातील पूरग्रस्त ढासला गावात मंगळवारी ( दि. १३ ) रात्री  १२ वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने एका घराची भिंत ढासळली. भिंतीच्या मलब्यात आजीआजोबासह नात दबली गेली. यात ८ वर्षीय श्रावणी मदन संगोळे हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शांताबाई सारंगधर सोनोने ( १६ ) व सारंगधर विश्वनाथ सोनोने ( ६५ ) हे मृत मुलीचे आजी-आजोबा जखमी झाले आहेत. 

सारंगधर सोनोने हे भूमिहीन मजूर आहेत. त्यांचे ढासला गावात घर आहे.  त्यांना एक मुलगी असून तिचे लग्न झालेले आहे. तिची मुलगी सोनोने यांच्याकडेच राहते. मंगळवारी रात्री आजीआजोबासह मुलगी घरात झोपली होती. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाने घराची भिंत कोसळून तिघांच्या अंगावर पडली. यात नात श्रावणी जागीच ठार झाली. तर आजीआजोबा  शांताबाई व सारंगधर हे जखमी आहेत. जखमींना गावातील अशोक नाईक, राजू सोनवणे, शिवाजी सोनवणे यांनी खाजगी वाहनाने बदनापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, आजी शांताबाई यांना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले आहे. 

२०१५  साली ढासला गावात महापुरामुळे जवळपास २५० घरे पडली होती. त्यावेळेस नुकसानभरपाई सोबत पक्के घरे बांधून देण्याचे आश्वासन तत्कालीन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, तहसीलदार यांनी गावकऱ्यांना दिले होते. कालांतराने नुकसानभरपाई मिळाली मात्र पक्के घरे अद्यापपर्यंत बांधून देण्यात आली नाही. शासनाकडून मिळणाऱ्या पक्क्या घराच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत. सर्वेक्षण आणि इतर बाबी पूर्ण होऊन सुद्धा घरकुल मिळत नाही. यातूनच पावसाने भिंत कोसळल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप सरपंच राम पाटील यांनी केला असून कुटुंबाला तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यूRainपाऊस