शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

"पक्ष टिकविण्यासाठी राहुल गांधीकडून मतदारांचा अपमान"; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:31 IST

पक्षाला टिकवून ठेवण्यासाठीच राहुल गांधीकडून निवडणूक आयोगावर आक्षेप: चंद्रशेखर बावनकुळे

अंबड (जालना) : "राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर वारंवार शंका घेऊन देशात संभ्रम निर्माण करत आहेत. ही पद्धत केवळ त्यांच्या पक्षाला टिकवून ठेवण्यासाठी आहे. ते मतदारांचा अपमान करत असून भारतीय लोकशाहीची बदनामी करत आहेत," असा हल्लाबोल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. महसूल सप्ताह सांगता समारंभानिमित्त शहरात आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

शहरातील मत्स्योदरी देवी संस्थानच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात शुक्रवारी दुपारी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ पार पडला. हा कार्यक्रम भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष आणि खास करून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. 

तसेच सरकार जनतेसमोर आपली भूमिका खुलेपणाने मांडत असून जनता दरबारासारख्या उपक्रमांतून थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असून, अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत," असेही ते म्हणाले.

राजकीय चर्चांना पूर्णविराम देताना त्यांनी स्पष्ट केले की, "माजी मंत्री राजेश टोपे यांनी भाजपमधील कोणत्याही नेत्याशी अद्याप संपर्क साधलेला नाही." समारंभास परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महसूल विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग