शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:52 AM

सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून जालना शहर व ग्रामीण भागाचा विकास साधण्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. यासाठी सत्ताधारी पक्षातील जे- जे नेते विकास निधी देण्यास मदत करतील, त्यांचे आपण सर्व सहकार्य घेऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना नगर परिषदेच्या वतीने घाणेवाडी जलाशय तुडूंब भरल्यानंतर या पाण्याचे शनिवारी पूजन करण्यात आले. यावेळी घाणेवाडी जल संरक्षण मंचसह रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी उद्योजक सुनिल रायठठ्ठा यांनी या ऐतिहासिक तलावाचे जालन्याची तहान भागविण्यासाठीचे महत्त्व विषद करून याचे जतन करण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले, जायकवाडी येथून जरी योजना केली आहे. तरी देखील घाणेवाडी जलाशयातून विना विद्युत खर्चाचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे याकडे आपले जातीने लक्ष राहणार आहे. मध्यंतरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला. थिंक टँक स्थापन करणारजालना शहराचा विकास नेमका कशा पध्दतीने केला जावा, यासाठी नागरिकांमधून सूचना मागविण्यात येतील, या सूचनांवर त्या- त्या विभागातील तज्ज्ञांचे मत आणि मार्गदर्शन घेतले जाईल. यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, रूक्मिणी परिवार, संस्कृती मंच यासह शहरातील अन्य सामाजिक व्यक्ती आणि संस्थांना सोबत घेऊन थिंक टँक स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी केली.

टॅग्स :MLAआमदारJalana Muncipalityजालना नगरपरिषदRural Developmentग्रामीण विकास