शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जालन्यात ४१ कोटी रुपयांची कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:02 IST

जालना शहरातील बाजार समितीच्या मैदानात सुरू केलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर ७५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरातील बाजार समितीच्या मैदानात सुरू केलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर ७५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक सुरू आहे. जालन्यासह परतूर, घनसावंगी, मंठा बदनापूर आदी ठिकांणी देखील कापसाची खरेदी जोरात सुरू असल्याचे सांगण्यात आले. जालना केंद्रावर जवळपास ४१ कोटी रूपयांची कापूस खरेदी झाल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी ठाकरे यांनी दिली.यंदा परतीच्या पावसामूळे कपाशीवर परिणाम होईल असे वाटले होते. परंतु पाहिजे तेवढा फटका या पावसाचा न बसल्याने शेतकऱ्यांना तारले आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशीचे उत्पादन अद्यापही सुरूच आहे. परंतु आता कृषी विभागाने सूचना दिल्यानुसार फरदड कापूस घेऊ नये जेणेकरून बोंड अळीची पुन्हा उत्पती होईल. ही बाब खरी असली तरी आजही कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता कायम असल्याचे दिसते.जालना येथील सीसीआयच्या मोंढ्यातील केंद्रावर दीड महिन्यात ७५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाला असला तरी आणखी एवढाच कापूस येथे खरेदी होईल अशी चिन्ह आहेत. यंदा हमीभाव चांगला मिळत असून, तो पाच हजार ५०० रूपये दिला आहे. त्यातच खाजगी व्यापा-यांकडून पाच हजार रूपयांचा भाव मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे शेतकरी हा त्यांचा कापूस सीसीआयकडेच विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचे ठाकरे म्हणाले.सीसीआयकडून खेरदी करण्यात येणारा कापूस हा जर १२ टक्केपेक्षा अधिक ओला असेल तो नाकारला जात आहे. परंतु असे असतांना कापसातील सरकीत अनेक जिनिंगमध्ये हा ओलावा थेट १८ टक्यांवर जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कापूस जर केवळ १२ टक्केच ओला असेल, तर सरकी ही त्यापेक्षा कमी ओली असायला हवी असे काहींचे म्हणणे आहे. या संदर्भात ठाकरे यांनी असे शक्य नसल्याचे सांगितले.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी