शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

कच-यातून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:36 AM

ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ओल्या कच-यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिका प्रशासन, सामाजिक संघटना आणि जनतेच्या सहकार्यातून शहरात प्रभागनिहाय खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, या कामात सर्वांंनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी गुरुवारी येथे केले.जालना नगर परिषदेतर्फे ओल्या कच-यापासून खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रायोगिक तत्त्वावर मोतीबाग उद्यानात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी गोरंट्याल बोलत होत्या. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी उपनगराध्यक्ष शाह आलम खान, इसा खा पठाण, राधाकिसन दाभाडे, विष्णू वाघमारे, रोहित बनवस्कर, स्वच्छता विभाग प्रमुख माधव जमधडे, अनिरुध्द निरंतर, शशांक कुलकर्णी, संदीप पाटील, डॉ. संजय रु ईखेडकर, नटराज चौधरी आदी उपस्थित होते.नगराध्यक्षा म्हणाल्या की, जालना शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या कामाला गेल्या काही दिवसांत निश्चितपणे गती आली असून, या कामात सर्वांनीच पुढाकार घेतल्याचे समाधान होत आहे. ओला आणि सुका कचरा यापूर्वी रेवगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये पाठवला जात होता.आता मात्र बॅक्टेरियल कल्चर जिवाणूच्या माध्यमातून ओल्या कच-यापासून खत निर्मिती करण्यासाठी जालना पालिकेने पुढाकार घेतला आहे.एकीकडे खत निर्मितीच्या माध्यमातून पालिकेला मासिक उत्पन्न मिळण्याबरोबरच दुसरीकडे शहर स्वच्छतेसाठी मोठी मदत अशा प्रकल्पामुळे होणार आहे. एका प्रकल्पाची खतनिर्मितीची क्षमता ११०० किलो इतकी राहणार असून, तीस ते चाळीस दिवसांत खत तयार होणार आहे.तयार झालेल्या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगून संबंधित विभागाने प्रमाणित केल्यानंतर नगर परिषदेमार्फत तयार सेंद्रीय खत शेतक-यांना विक्री केले जाईल. प्रभागाबरोबरच जालना पालिकेच्या मागील बाजूस, जलशुध्दीकरण केंद्राच्या जागेत अशा प्रकारचे खत निर्मितीचे प्रकल्प सुरु करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.कोल्हापूर येथील अनिरुद्ध निरंतर यांनी उपस्थितांना ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून यासंदर्भात मार्गदर्शन केले. आतापर्यंत राज्यातील जवळपास ३५ नगरपालिकांनी हा प्रकल्प सुुरु केलेला असून, त्यातून काही नगरपालिकांना उत्पन्नदेखील मिळू लागल्याचे त्यांनी सांगितले.