शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्टील उद्योगांच्या हालचालींवर पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

जालना : गेल्या महिनाभरात स्टीलच्या किमती या सर्व करासहित ५० हजारांपेक्षा वर पोहचल्या आहेत. यामुळे पायाभूत कामांना लागणारा खर्च ...

जालना : गेल्या महिनाभरात स्टीलच्या किमती या सर्व करासहित ५० हजारांपेक्षा वर पोहचल्या आहेत. यामुळे पायाभूत कामांना लागणारा खर्च वाढला असून, लोखंडी सळया निर्मितीसाठी जालन्यातील उद्योग प्रामुख्याने स्क्रॅपचा वापर करतात, तर काही स्टील उद्योग हे खाणीतून निघणाऱ्या आयर्न-लोहखनिजाचा उपयोग करतात. त्यामुळे निर्यात होणाऱ्या लोहखनिजावर साधारपणे ३० टक्के निर्यात शुल्क आकारण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय वाणिज्य विभागाला कळविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या अनलॉकनंतर रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्रात तेजी आली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य मोठ्या शहरांत लॉकडाऊनमध्ये बंद पडलेल्या बांधकाम उद्योगाने आता भरारी घेतली आहे. याचा परिणाम स्टीलच्या मागणीत वाढ होऊन किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी सर्व करांसहित ४२ हजार रुपये प्रतिटन दर होते. त्यात आता वाढ होऊन हेच दर सर्व कर मिळून ५२ ते ५३ हजार रुपये प्रतिटनावर पोहचले आहेत.

यामुळे या दरांवर नियंत्रण आणावे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयास दिले होते. त्या पत्राची तातडीने दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय वाणिज्य विभागाला एक पत्र लिहिले असून, त्यात भारतातून परदेशातील स्टील उत्पादक कंपन्यांना कच्चा माल अर्थात लोहखनिज विक्री करताना त्यावर ३० टक्के वाढीव निर्यात कर लावण्याची शिफारस केली आहे. तसेच येथील स्टील उत्पादक कंपन्यांना हा कच्चा माल कसा पुरविता येईल याबाबतही विचार करण्यासाठी पत्र लिहिले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयाने १५ डिसेंबरला केंद्रीय वाणिज्य विभागाला पाठविले आहे. या पत्रावर परदेश व्यापार विभागाचे विकास अधिकारी रामपाल सिंग यांची सही आहे. केंद्रीय पाेलाद मंत्रालयाने लक्ष घालून जास्तीत जास्त कच्चा माल परवडणाऱ्या किमतीत कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार करावा, याबद्दलही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. हे पत्र केवळ जालन्यातील स्टील उद्योगांसाठी नसून, हे संपूर्ण देशातील एकूणच स्टील उद्योगांशी संबंधित असल्याचे येथील उद्योजकांनी सांगितले.

चौकट

चीनसह अन्य देशांची निर्यात थांबवावी

जालन्यात असलेल्या स्टील उद्योजकांकडून सेकंडरी अर्थात स्क्रॅपच्या माध्यमातून लोखंडी सळयांची निर्मिती केली जाते. यासंदर्भात या उद्योगांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र लिहिून कच्चा माल पुरवावा, अशी मागणी केली. तसेच चीनसह अन्य देशांत या कच्च्या मालाची जी निर्यात होते, ती थांबवावी अशी मागणी केली आहे. देशातील सेकंडरी स्टील उत्पादकांना ९० ते १०० मेट्रिक टन एवढा कच्चा माला वर्षाकाठी लागतो. विशेष म्हणजे सेकंडरी स्टील उद्योग हा देशात ५० टक्क्यांपेक्षा अधिक स्टीलचे उत्पादन करतो.

योगेश मानधनी, अध्यक्ष स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, महाराष्ट्र.