शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:06 IST

जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. येथील शीतल गार्डनमध्ये हे संमेलन होणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संमेलनाविषयी माहिती देताना कार्यकारी संघटक किशोर ढमाले म्हणाले, परिवर्तनवादी चळवळीला गती देण्यासाठी या विद्रोही संमेलनाचे आयोजन गत पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात केले जाते. मराठवाड्यातील हे चौथे साहित्य संमेलन आहे. लोकवर्गणीतून या संमेलनाचे आयोजन केले जाते. शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख अनुदान देत असले तरी तेथे केवळ भोजनावळी होतात, असा आरोपही ढमाले यांनी केला. या संमेलनात पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करून अन्याय- अत्याचाराला या संमेलनातून वाचा फोडली जाते. या संमेलनात आदिवासी समूहाला प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे सांस्कृतिक आणि पारंपरिक नृत्य हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.१४ मार्च रोजी ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. यात कवीसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद, गटचर्चा यासह अन्य प्रमुख कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ अधिकाधिक सक्षम व्हावी, या हेतूने आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने या संमेलनास भरभरून प्रतिसाद दिला आहे. जालना येथील संमेलनही असेच ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनास महाराष्ट्रातून दोन हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांच्या निवास, भोजन आणि अन्य विषयांसंदर्भातील काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राम गायकवाड यांनी या संमेलनाच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. संमेलनाध्यक्ष पाटील यांचा विविाध ठिकाणी नागरी सत्कार करण्यात येणार असून, जालन्यात १३ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात स्थानिक कवींसाठी स्वतंत्र संमेलन होणार आहे. बालमंच हे या संमेलनाचे स्वतंत्र दालन राहणार आहे. पथनाट्याच्या माध्यमातून ८ मार्च रोजी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जालन्यातील साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, कार्यवाहक राजेश ओ. राऊत, स्वागताध्यक्ष विजय पंडित, बुलडाणा येथील प्रा. पी. एस. खिल्लारे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तणपुरे, राजू घुले आदींची उपस्थिती होती.आज देशात केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे चुकीचे निर्णय घेऊन ते लादले जात आहेत. यावर सविस्तर मंथन या संमेलनात होणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे भोजनावळ्यांना येथे स्थान राहणार नाही. येथे विचारांचे मंथन होऊन समाजाला एकप्रकारची दिशा देण्याचे काम संमेलनातून आम्ही करणार असल्याचे किशोर ढमाले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक