शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

विद्रोही साहित्य संमेलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:06 IST

जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथे १४ व १५ मार्च असे दोन दिवस १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिध्द साहित्यिक आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. येथील शीतल गार्डनमध्ये हे संमेलन होणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संमेलनाविषयी माहिती देताना कार्यकारी संघटक किशोर ढमाले म्हणाले, परिवर्तनवादी चळवळीला गती देण्यासाठी या विद्रोही संमेलनाचे आयोजन गत पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात केले जाते. मराठवाड्यातील हे चौथे साहित्य संमेलन आहे. लोकवर्गणीतून या संमेलनाचे आयोजन केले जाते. शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ५० लाख अनुदान देत असले तरी तेथे केवळ भोजनावळी होतात, असा आरोपही ढमाले यांनी केला. या संमेलनात पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करून अन्याय- अत्याचाराला या संमेलनातून वाचा फोडली जाते. या संमेलनात आदिवासी समूहाला प्राधान्य देण्यात आले असून, त्यांचे सांस्कृतिक आणि पारंपरिक नृत्य हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.१४ मार्च रोजी ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. यात कवीसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद, गटचर्चा यासह अन्य प्रमुख कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ अधिकाधिक सक्षम व्हावी, या हेतूने आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने या संमेलनास भरभरून प्रतिसाद दिला आहे. जालना येथील संमेलनही असेच ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनास महाराष्ट्रातून दोन हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांच्या निवास, भोजन आणि अन्य विषयांसंदर्भातील काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राम गायकवाड यांनी या संमेलनाच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. संमेलनाध्यक्ष पाटील यांचा विविाध ठिकाणी नागरी सत्कार करण्यात येणार असून, जालन्यात १३ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या संमेलनात स्थानिक कवींसाठी स्वतंत्र संमेलन होणार आहे. बालमंच हे या संमेलनाचे स्वतंत्र दालन राहणार आहे. पथनाट्याच्या माध्यमातून ८ मार्च रोजी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जालन्यातील साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, कार्यवाहक राजेश ओ. राऊत, स्वागताध्यक्ष विजय पंडित, बुलडाणा येथील प्रा. पी. एस. खिल्लारे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तणपुरे, राजू घुले आदींची उपस्थिती होती.आज देशात केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे चुकीचे निर्णय घेऊन ते लादले जात आहेत. यावर सविस्तर मंथन या संमेलनात होणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे भोजनावळ्यांना येथे स्थान राहणार नाही. येथे विचारांचे मंथन होऊन समाजाला एकप्रकारची दिशा देण्याचे काम संमेलनातून आम्ही करणार असल्याचे किशोर ढमाले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक