शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghodbunder Traffic Update: गायमुख घाट उतरणीवर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत ११ वाहने एकमेकांवर आदळली, चार जण जखमी
2
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
4
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
5
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
6
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
7
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
8
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
9
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
10
Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
11
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
12
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
13
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
14
एका चुकीच्या क्लिकने 'आयुष्यभराची कमाई' साफ; सायबर भामट्यांनी चलानच्या नावाखाली लुटले ३.६ लाख
15
देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू 
16
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
17
Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
बजाज-अलायन्झचा २४ वर्षांचा प्रवास संपला! संजीव बजाज यांची 'मास्टरस्ट्रोक' डील; आता पूर्ण मालकी भारतीयांकडे
19
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
20
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
Daily Top 2Weekly Top 5

पळून गेलेल्या विवाहितेचे लग्नासाठी पोलिसांना साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:10 IST

पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पैठण तालुक्यातून आतेभावासोबत पळून आलेल्या विवाहितेने चक्क भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन त्याच्याशी माझा विवाह करून देण्यासाठी चक्क पोलिसांनाच साकडे घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.घटनेची माहिती अशी की, एका १९ वर्षीय तरूणीचे (कडेठाण ता. पैठण) येथील २५ वर्षीय तरुणा सोबत सहा महिन्या पूर्वी लग्न झाले होते. हे पती - पत्नी दोघेही कडेठाण येथे वास्तव्य करीत होते. मात्र १९ वर्षीय तरूणीचा जीव दुसरीकडेच गुंतलेला होता. त्यामुळे तिला कडेठाणमध्ये मन लागत नव्हते. तिचे ढोरकीण येथील आतेभावासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती नेहमी त्याच्या संपर्कात होती, शेवटी सोबत जगण्याच्या व सोबत राहण्याच्या घेतलेल्या आणाभाका तिला काही कडेठाण येथे राहू देत नव्हत्या. शेवटी १४ जानेवारी रोजी सदर विवाहित तरूणी तिच्या २५ वर्षीय आतेभावा सोबत कडेठाण येथून पळून जाण्याचा निर्णय घेऊन कठेठाण सोडले.परंतु आता कोठे जावे, काय करावे, विवाह कोठे करावा असे प्रश्न त्यांच्या समोर पडला होता, मात्र तिच्या आतेभावाचा मित्र भोकरदन तालुक्यातील मलकापूर येथे होता, हे दोघेही १४ जानेवारीला त्याच्या घरी आले व दोन दिवस मुक्काम केला. मात्र मित्राला त्याने ही तरूणी पळून आणल्याचा प्रकार कळल्यावर त्याने या प्रेमीयुगुलास १५ जानेवारी रोजी रात्री भोकरदन पोलीस ठाण्यात हजर केले. त्यावेळी सदर विवाहित तरूणीने आपला विवाह हा आपल्या सोबत असलेल्या आतेभावासोबतच करून द्यावा असा हट्ट धरल्याने पोलीसही अचंबित झाले. एका विवाहित मुलीचा दुसऱ्या सोबत विवाह कसा लावावा, हा त्यांच्यासमोर यक्षप्रश्न पडला होता. त्या तरूणीने निरीक्षक दशरथ चौधरी यांना सांगितले की माझ्या आई - वडिलांनी माझ्या मनाविरूध्द विवाह केला होता, ते पती मला पसंतनाही, तुम्ही माझा विवाह माझ्या आतेभावासोबत लावून द्यावा नंतरच आम्ही ठाणे सोडू असा हट्ट धरला. यावेळी निरीक्षक चौधरींनी त्यांची समजूत काढली. जोपर्यंत पतीसोबत घटस्फोट होत नाही, तोपर्यंत दुसरा विवाह करता येणार नाही असे सांगून, रात्रभर ठाण्यातच ठेवून घेतले. याची माहिती पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना देऊन ठाण्यात गुरूवारी बोलावून घेतले. यावेळी विवाहितेला त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती निरीक्षक चौधरी यांनी दिली. या प्रकाराने पोलीसही चक्रावून गेले होते.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसFamilyपरिवारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट