शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पिंपळगावच्या मिरचीचा विदेशी बाजारात तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:04 IST

पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.

रवी लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात दिवसेंदिवस मिरचीची आवक वाढत आहे. येथील मिरचीला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे दुष्काळात हिरवी मिरची शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे. विशेषत: पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणा-या मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.येथील मिरची खरेदी करण्यासाठी परराज्यातील अनेक व्यापारी येतात. सध्या मिरची बाजारात ५५० टन मिरचीची आवक असून, दररोज २ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी दरवर्षी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून मिरचीचे उत्पादन घेतो.यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही विकतचे पाणी घेऊन मिरची लागवड केली. महिन्याभरापासून मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. ज्या शेतक-यांकडे पाणी नव्हते, त्यांनी जून महिन्यात मिरचीची लागवड केली. या शेतक-यांची देखील मिरची तोडणीसाठी आली आहे.मिरची खरेदी करण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठा बाजार भरतो.या बाजारात परराज्यातील तसेच परिसरातील २५ ते ३० व्यापारी येतात. सध्या बाजारात मिरचीची आवक वाढली असून, येथे सिल्लोड, कन्नड, बुलडाणा, चिखली, जळगाव इ. भागांसह चाळीस खेड्यांतील शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे येथे दररोज ५५० टन मिरची खरेदी केली जात आहे.दररोज मिरचीतून २ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.मिरची जातेय परदेशातव्यापारी या मिरचीला दिल्ली, वाशी, अझमगड, लखनौ, आग्रा, झाशी, गोरखपूर, छत्तीसगड, दुबई, बांगलादेश, श्रीलंका, मध्यप्रदेश, सूरत, वापी, बडोदा, जबलपूर, अहमदाबाद, रतलाम, कलकत्ता, कानपूर, कन्याकुमारी सारख्या नामांकित बाजारपेठेत पाठवितात. प्रारंभी ७ हजार रुपये भाव मिळणा-या मिरचीला सध्या बाजारात ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.पिंपळगाव रेणुकाई गावासाठी ठरले वरदानपिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजार गावासाठी वरदान ठरला आहे. येथील बाजारात परजिल्ह्यासह परिसरातील २१०० शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊनयेतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या मिरची बाजारामुळे गावातील हॉटेल्स, कृषी सेवा केंद्र, दुकाने आदी दुकानदारांचे देखील उत्पन्न वाढले आहे. तसेच परिसरातील मजुरांच्या हाताला कामही मिळाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजारFarmerशेतकरीdroughtदुष्काळ