शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावच्या मिरचीचा विदेशी बाजारात तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:04 IST

पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.

रवी लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात दिवसेंदिवस मिरचीची आवक वाढत आहे. येथील मिरचीला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे दुष्काळात हिरवी मिरची शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे. विशेषत: पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणा-या मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.येथील मिरची खरेदी करण्यासाठी परराज्यातील अनेक व्यापारी येतात. सध्या मिरची बाजारात ५५० टन मिरचीची आवक असून, दररोज २ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी दरवर्षी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून मिरचीचे उत्पादन घेतो.यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही विकतचे पाणी घेऊन मिरची लागवड केली. महिन्याभरापासून मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. ज्या शेतक-यांकडे पाणी नव्हते, त्यांनी जून महिन्यात मिरचीची लागवड केली. या शेतक-यांची देखील मिरची तोडणीसाठी आली आहे.मिरची खरेदी करण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठा बाजार भरतो.या बाजारात परराज्यातील तसेच परिसरातील २५ ते ३० व्यापारी येतात. सध्या बाजारात मिरचीची आवक वाढली असून, येथे सिल्लोड, कन्नड, बुलडाणा, चिखली, जळगाव इ. भागांसह चाळीस खेड्यांतील शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे येथे दररोज ५५० टन मिरची खरेदी केली जात आहे.दररोज मिरचीतून २ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.मिरची जातेय परदेशातव्यापारी या मिरचीला दिल्ली, वाशी, अझमगड, लखनौ, आग्रा, झाशी, गोरखपूर, छत्तीसगड, दुबई, बांगलादेश, श्रीलंका, मध्यप्रदेश, सूरत, वापी, बडोदा, जबलपूर, अहमदाबाद, रतलाम, कलकत्ता, कानपूर, कन्याकुमारी सारख्या नामांकित बाजारपेठेत पाठवितात. प्रारंभी ७ हजार रुपये भाव मिळणा-या मिरचीला सध्या बाजारात ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.पिंपळगाव रेणुकाई गावासाठी ठरले वरदानपिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजार गावासाठी वरदान ठरला आहे. येथील बाजारात परजिल्ह्यासह परिसरातील २१०० शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊनयेतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या मिरची बाजारामुळे गावातील हॉटेल्स, कृषी सेवा केंद्र, दुकाने आदी दुकानदारांचे देखील उत्पन्न वाढले आहे. तसेच परिसरातील मजुरांच्या हाताला कामही मिळाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजारFarmerशेतकरीdroughtदुष्काळ