शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

पिंपळगावच्या मिरचीचा विदेशी बाजारात तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:04 IST

पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणाºया मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.

रवी लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात दिवसेंदिवस मिरचीची आवक वाढत आहे. येथील मिरचीला बाजारात समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे दुष्काळात हिरवी मिरची शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे. विशेषत: पिंपळगाव रेणुकाई परिसरात उत्पादित होणा-या मिरचीला विदेशी बाजारपेठेतही मागणी वाढली आहे.येथील मिरची खरेदी करण्यासाठी परराज्यातील अनेक व्यापारी येतात. सध्या मिरची बाजारात ५५० टन मिरचीची आवक असून, दररोज २ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील शेतकरी दरवर्षी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून मिरचीचे उत्पादन घेतो.यंदा देखील परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही विकतचे पाणी घेऊन मिरची लागवड केली. महिन्याभरापासून मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. ज्या शेतक-यांकडे पाणी नव्हते, त्यांनी जून महिन्यात मिरचीची लागवड केली. या शेतक-यांची देखील मिरची तोडणीसाठी आली आहे.मिरची खरेदी करण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठा बाजार भरतो.या बाजारात परराज्यातील तसेच परिसरातील २५ ते ३० व्यापारी येतात. सध्या बाजारात मिरचीची आवक वाढली असून, येथे सिल्लोड, कन्नड, बुलडाणा, चिखली, जळगाव इ. भागांसह चाळीस खेड्यांतील शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे येथे दररोज ५५० टन मिरची खरेदी केली जात आहे.दररोज मिरचीतून २ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.मिरची जातेय परदेशातव्यापारी या मिरचीला दिल्ली, वाशी, अझमगड, लखनौ, आग्रा, झाशी, गोरखपूर, छत्तीसगड, दुबई, बांगलादेश, श्रीलंका, मध्यप्रदेश, सूरत, वापी, बडोदा, जबलपूर, अहमदाबाद, रतलाम, कलकत्ता, कानपूर, कन्याकुमारी सारख्या नामांकित बाजारपेठेत पाठवितात. प्रारंभी ७ हजार रुपये भाव मिळणा-या मिरचीला सध्या बाजारात ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.पिंपळगाव रेणुकाई गावासाठी ठरले वरदानपिंपळगाव रेणुकाई येथील मिरची बाजार गावासाठी वरदान ठरला आहे. येथील बाजारात परजिल्ह्यासह परिसरातील २१०० शेतकरी मिरची विक्रीसाठी घेऊनयेतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या मिरची बाजारामुळे गावातील हॉटेल्स, कृषी सेवा केंद्र, दुकाने आदी दुकानदारांचे देखील उत्पन्न वाढले आहे. तसेच परिसरातील मजुरांच्या हाताला कामही मिळाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजारFarmerशेतकरीdroughtदुष्काळ