शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पंचायतराज समितीकडून जिल्हा परिषदेचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:07 AM

जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य तसेच जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणावर निकष डावलून कामे झाली आहेत. या सर्व कामांची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून तीन महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना पंचायत समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य तसेच जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणावर निकष डावलून कामे झाली आहेत. या सर्व कामांची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून तीन महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना पंचायत समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना दिली. गेल्या तीन दिवसात २०१३-२०१४ लेखा परीक्षण आणि त्यावर नोंदविलेल्या आक्षेपांची तपासणी २८ मुद्यांवर केल्याचेही त्यांनी सांगितले.जालना जिल्हा परिषदेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जलसंधारणाची जवळपास ४०९ कामे करण्यात आली आहेत. पैकी जी कामे केली त्यांची साधी मोजणी देखील न केल्याने ही कामे अपूर्ण असून, यामुळे सिंचनावर होणाºया लाखो रूपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामांपैकी केवळ १२६ कामांची संयुक्त मोजणी झाली आहे. या उर्वरित कामांची तपासणी करण्यासाठी गुरूवारी समितीने पुणे येथील सिंचन विभागाच्या आयुक्तांना जालन्यात पाचारण केले होते. एकूणच तांत्रिक कामे करणारे वरिष्ठ अधिकारी हे नीट जबाबदारीने कामे करत नसल्याचे दिसून आले. त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. कारवाई करताना ग्रामसेवक तसेच अन्य तांत्रिक ज्ञान नसलेल्यांवर कारवाई करून प्रशासन मोकेळे होते. परंतु आता हे होणार नसून, तांत्रिक मान्यता देणाºया व नंतर त्यावर निगराणी ठेवणाºया यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाºयांना दोषी ठरविण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेतील आरोग्य तसेच शिक्षण विभागात कर्मचाºयांची भरती करतानाही अनेक निकष डावलले असल्याचे दिसून आले. यात वाहने भाड्याने घेण्याच्या पध्दतीतही अनेक दोष असून, या सर्व बाबींची समितीने गंभीर दखल घेतल्याचे आ. पारवे म्हणाले. समितीने लेखा परीक्षकांनी जे आक्षेप नोंदविले होते, त्याकडे नंतर प्रशासनातील अधिकाºयांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे वास्तव त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा या ज्ञानी आणि हुशार अधिकारी असल्याचे सांगतानाच त्यांनी उपरोधिक स्वरात त्यांच्या विषयीचा उल्लेख केला.जालना : पंचायत राज समितीकडून अनेक विभागांची चौकशीजालना जिल्हा परिषदेत अनुक्रमे २२ कोटी आणि ७७ कोटी रूपयांचा निधी वापरत असताना त्यात आक्षेप असल्याचे आ. पारवे यांनी मान्य केले.या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश उच्चस्तरीय अधिकाºयांना दिले असून, त्यातील तथ्य देखील लकवरच आमच्यासमोर येणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच जिल्हा परिषदेतील, बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य विभागा बाबतही गंभीर त्रुटी असल्याचे आ. पारवे यांनी नमूद केल्याने जिल्हा परिषदेत सर्व काही आलबेल सुरू आहे, असे नसल्याचेही ते म्हणाले. २०१२ मध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या आल्या होत्या, आता गायब असल्याची चौकशी करण्याची विनंती त्यांनी अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी केली. ती खोतकर यांनी मान्य केली.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदGovernmentसरकार