शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

पंचनामे, पीकविम्यातील भेदभाव खपवून घेणार नाही- खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:34 AM

शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप पिकांसह फळबागा नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पंचनामे करताना तसेच पीक विम्यातून लागवड केलेल्या फळबाग उत्पादक शेतक-यांची नावे वगळण्याचा भेदभाव यंत्रणेकडून होत असल्याच्या तक्रारी असून, त्यामुळे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला.खोतकर यांनी सोमवारी प्रशासकीय अधिका-यांसमवेत शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांनी खचून जाऊ नये. आपण स्वत:, शिवसेना पक्ष व शासन तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे सांगत खोतकरांनी शेतक-यांना धीर दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंचायत समिती सभापती पांडुरंग डोंगरे, पं.स. सदस्य जनार्दन चौधरी, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, बाबा मोरे, तुळशीदास काळे, मुरलीधर शेजुळ, तुकाराम शेजुळ, मुरलीधर थेटे, शैलेश घुमारे, काशिनाथ जाधव, प्रभाकर सुळसुळे, गणेश शिंदे, आप्पासाहेब उगले, सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.खोतकर यांनी गोलापांगरी येथील मनोज मोरे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. तसेच कल्याण प्रकल्प सिडस येथे उध्वस्त झालेले कापूस, सोयाबीन व मका आदी पिकांची पाहणी केली. जळगाव सोमनाथ, वखारी व धारकल्याण येथे भेटी देऊन बागांची पाहणी केली. दरम्यान, बाजीउम्रद येथील शेतकरी शिवाजी डोंगरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत  संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी शेतक-यांनीही आपल्या व्यथा खोतकरांसमोर मांडल्या.खरीप हंगामातील दमडीही शेतक-यांच्या हाती मिळाली नाही. खचलेल्या शेतक-यांनी पुन्हा नव्या उमेदीने काही ठिकाणी रबी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाची पेरणी केली. मात्र दिवाळीनंतर पडलेल्या अवकाळी पावसाने ही पेरणीही वाया गेली आहे. त्यामुळे पंचनामे करताना खरिपाबरोबर रबी हंगामातील पेरणी, पिकांचे स्वतंत्र पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना खोतकरांनी दिल्या.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीRainपाऊस