समाज हिताच्या कामासाठी संघटना महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:09+5:302021-02-10T04:31:09+5:30
पिंपळगाव रेणुकाई : व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, संकटात सर्वताेपरी मदत करण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि समाज हिताची कामे करण्यासाठी संघटना ...

समाज हिताच्या कामासाठी संघटना महत्त्वाची
पिंपळगाव रेणुकाई : व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, संकटात सर्वताेपरी मदत करण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि समाज हिताची कामे करण्यासाठी संघटना महत्त्वाची असते, असे प्रतिपादन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले.
पिंपळगाव रेणुकाई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, जिल्हा सचिव प्रवीण मोहता, जिल्हा सहसचिव जगन्नाथ थोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी गणेश तुळशीराम लोंखडे, उपाध्यपदी विठ्ठल गणेशराव देशमुख, सचिवपदी भीमराव पुंडलिक नरवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटना ही नुसती नावाला नको तर त्या संघटनेच्या माध्यमातून समाजहिताच्या कामाव्यतिरिक्त व्यापाऱ्यांच्यादेखील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. येणाऱ्या काळात व्यापारी व जैन संघटनांच्या माध्यमातून अनेक गावात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावातील व्यापारी महासंघातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही बंब यांनी केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष शिवाजी देशमुख, भीवसन सोरमारे, संजय बेराड, विठ्ठल खेकाळे, विजय धायडे, संदीप काटोले, संदीप देशमुख, साहेबराव मिसाळ, राजू देशमुख, ज्ञानेश्वर सास्ते, दिनेश राजपूत, समाधान नागवे, बालू देशमुख, गजानन देशमुख, अक्षय गायकवाड, कैलास मिसाळ, कुणाल बावस्कर आदींची उपस्थिती होती.
फोटो