शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा- पोलीस अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:37 AM

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अयोध्या येथील राम जन्मभूमी व बाबरी मशिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाऱ्या निर्णयाचा सर्व समाज घटकांनी आदर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.जालना शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव, सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख, शामसुंदर कौठाळे, सुरेंद्र गंदम यांच्यासह अधिकारी, समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. बैठकीसाठी परशुराम पवार, कैलास जावळे, रवी देशमुख, देवाशीष वर्मा, राधाकिसन जायभाये, कडुबा सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत सोशल मीडियावर टिकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. त्या दृष्टीने पोलीस दलाच्या वतीनेही सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच जमाव करू नये, निकालानंतर कोणीही गुलाल उधळू नये किंवा निषेध करू नये, जातीय अफवा पसरवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाAyodhyaअयोध्याCourtन्यायालय