शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 19:34 IST

चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. : मनोज जरांगे

वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी दिवसभरात समाजाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेल्या १८०० वर इच्छुकांशी चर्चा केली. या चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. आज केवळ चर्चा झाली असून, अंतिम निर्णय हा २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत समाज घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षण आंदोलन, निवडणुकांबाबत आज इच्छुकांशी चर्चा केली आहे. पुढे कसे जायचे, निवडणुकीचे चांगले-वाईट परिणाम यासह इतर बाबींवर चर्चा झाली. आम्हाला ९५ टक्के समाजकारण आणि ५ टक्के राजकारण करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व समाज महत्त्वाचा आहे. आज मराठा समाजासह मुस्लिम, मागासवर्गीय, १८ पगड जातीतील समाजाचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आज केवळ चर्चा झाली आहे. १८०० वर इच्छुकांचे अर्ज आले आहेत. याला गर्दी न म्हणता समाजाच्या आक्रोशाची लाट म्हणता येईल. ही लाट शंभर टक्के विजयाकडे जाणार असल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. शेवटी लढायचे की पाडायचे याचा अंतिम निर्णय हा समाज घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

बैठकीला मोठी गर्दीआगामी विधानसभेत लढायचे की पाडायचे यावर जरांगे पाटील यांनी इच्छुकांना अंतरवाली सराटी येथे बैठकीसाठी बोलाविले होते. अंतरवाली सराटी हजारोच्या संख्येने इच्छुक उपस्थित होते. यादरम्यान लढायचे की पाडायचे याबाबत सर्वांनी आपले मते मांडली. ही बैठक सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालू होती. यावेळी रामगव्हाण रोडला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण