शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आता तालुकानिहाय शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:00 AM

जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. दरम्यान हा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनासुार घेण्यात आला.जालना जिल्ह्यात एकूण दोन लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. पैकी ११३ गावांमध्ये या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अंदाजित या बोंड अळीमुळे २० हजार २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे शेतकºयांनी घाबरून जाता ज्या कपाशीच्या झाडात या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतो ते फूल खोडून टाकण्याचे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात येत आहे. जेणेकरून त्या अळीची उत्पत्ती वाढ रोखण्यात मोठी मदत होणार आहे.यासाठी नेमके काय केले पाहिजे यासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच बदनापूर येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार येणार आहे. शास्त्रज्ञांप्रमाणे कृषी महाविद्यालयातील जवळपास २०० पेक्षा अधिक विद्यार्थी थेट बांधावर भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन, प्रा. अजय मिटकरी यांचीही उपस्थिती होती असे माईनकर यांनी नमूद केले.युरियाचा वापर कमी करासध्या पाऊस पडून गेल्याने बहुतांश शेतकरी हे पिकांना युरिया देण्यासाठी लगबग करत आहे. मात्र युरियामुळे रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतक-यांनी युरीयाचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल शेतक-यांनी घ्यावी असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले. एकूणच बोंड अळीमुळे शेतकरी आणि प्रशासन हादरले आहे.बोंड अळीपासून कपशीचे रक्षण कसे करावे यासाठी कृषी विभागाने माहिती पत्रक काढले आहे. हे जवळपास एक हजार शेतक-यांपर्यंत पोहोचविले असल्याची माहिती कृषी अधीक्षक माईनकर यांनी दिली आहे. तसेच गावागावात मोठे पोस्टर लावूनही जाणीव जागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :cottonकापूसscienceविज्ञान