शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 18:40 IST

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात महत्त्वूपर्ण विधान केलं आहे. युतीसाठी कोणापुढेही लाचार नाही. जे हिंदुत्व मानतात ते सोबतच येतीलच. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच युतीची काळजी करू नका, असे म्हणत एकप्रकारे युतीसाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे सांगितलंय.

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपात प्रवेश केला. ढोबळे हे सोलापुरातून लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असल्याचं समजतं. येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तर भाजपा-सेना युतीबाबतही आपली भूमिका मांडली. शिवसेनेसोबत युती केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दुर ठेवता येणार आहे. युतीसाठी आम्ही पुर्वीपासूनच सकारत्मक आहोत. परंतु, युती न झाल्यासही आमची स्वबळावर  लढण्याची तयारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 60 वर्षांमध्ये जेवढे खड्डे खोदले आहे. ते भरण्याचे काम आम्ही पाच वर्षात केले. आणि पुढे ही करणार आहोत. 2008 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने केवळ 6 हजार कोंटीची कर्जमाफी दिली होती. परंतु, ती नेमकी कोणत्या शेतकºयांना मिळाली. याच्या याद्या त्यांनी सादर कराव्यात. असे आवाहन करुन आम्ही दिलेली कर्जमाफी 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. आणि त्याचा तंतोत हिशोब आमच्याकडे आहे. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढून दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना यशस्वी झाली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुष्काळासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच मोदींच्या कामकाजाचे कौतुक करताना महागठबंधन आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. विरोधकांनी आजपर्यंत जेवढं काम केलं, तेवढं काम मोदींना चार वर्षांत केलंय. देशात, सध्या विरोधकांचे धोरण फक्त मोदी हटाव असंच आहे. मोदींनी दिल्लीतील दलालांचं राज्य संपुष्टात आणले, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, नुकताच पालिका निवडणुकीत तीन ठिकाणी भाजपाचा विजय झाल्याचं सांगताना, जनतेच्या मनात भाजपाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. निवडणुकीआधी विरोधकांना नेता निवडता येत नाही. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा