शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 18:40 IST

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात महत्त्वूपर्ण विधान केलं आहे. युतीसाठी कोणापुढेही लाचार नाही. जे हिंदुत्व मानतात ते सोबतच येतीलच. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच युतीची काळजी करू नका, असे म्हणत एकप्रकारे युतीसाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे सांगितलंय.

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपात प्रवेश केला. ढोबळे हे सोलापुरातून लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असल्याचं समजतं. येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तर भाजपा-सेना युतीबाबतही आपली भूमिका मांडली. शिवसेनेसोबत युती केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दुर ठेवता येणार आहे. युतीसाठी आम्ही पुर्वीपासूनच सकारत्मक आहोत. परंतु, युती न झाल्यासही आमची स्वबळावर  लढण्याची तयारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 60 वर्षांमध्ये जेवढे खड्डे खोदले आहे. ते भरण्याचे काम आम्ही पाच वर्षात केले. आणि पुढे ही करणार आहोत. 2008 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने केवळ 6 हजार कोंटीची कर्जमाफी दिली होती. परंतु, ती नेमकी कोणत्या शेतकºयांना मिळाली. याच्या याद्या त्यांनी सादर कराव्यात. असे आवाहन करुन आम्ही दिलेली कर्जमाफी 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. आणि त्याचा तंतोत हिशोब आमच्याकडे आहे. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढून दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना यशस्वी झाली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुष्काळासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच मोदींच्या कामकाजाचे कौतुक करताना महागठबंधन आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. विरोधकांनी आजपर्यंत जेवढं काम केलं, तेवढं काम मोदींना चार वर्षांत केलंय. देशात, सध्या विरोधकांचे धोरण फक्त मोदी हटाव असंच आहे. मोदींनी दिल्लीतील दलालांचं राज्य संपुष्टात आणले, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, नुकताच पालिका निवडणुकीत तीन ठिकाणी भाजपाचा विजय झाल्याचं सांगताना, जनतेच्या मनात भाजपाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. निवडणुकीआधी विरोधकांना नेता निवडता येत नाही. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा