शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 18:40 IST

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात महत्त्वूपर्ण विधान केलं आहे. युतीसाठी कोणापुढेही लाचार नाही. जे हिंदुत्व मानतात ते सोबतच येतीलच. सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच युतीची काळजी करू नका, असे म्हणत एकप्रकारे युतीसाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे सांगितलंय.

जालन्यात आज भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपात प्रवेश केला. ढोबळे हे सोलापुरातून लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक असल्याचं समजतं. येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. तर भाजपा-सेना युतीबाबतही आपली भूमिका मांडली. शिवसेनेसोबत युती केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दुर ठेवता येणार आहे. युतीसाठी आम्ही पुर्वीपासूनच सकारत्मक आहोत. परंतु, युती न झाल्यासही आमची स्वबळावर  लढण्याची तयारी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 60 वर्षांमध्ये जेवढे खड्डे खोदले आहे. ते भरण्याचे काम आम्ही पाच वर्षात केले. आणि पुढे ही करणार आहोत. 2008 मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने केवळ 6 हजार कोंटीची कर्जमाफी दिली होती. परंतु, ती नेमकी कोणत्या शेतकºयांना मिळाली. याच्या याद्या त्यांनी सादर कराव्यात. असे आवाहन करुन आम्ही दिलेली कर्जमाफी 40 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. आणि त्याचा तंतोत हिशोब आमच्याकडे आहे. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढून दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना यशस्वी झाली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुष्काळासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच मोदींच्या कामकाजाचे कौतुक करताना महागठबंधन आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. विरोधकांनी आजपर्यंत जेवढं काम केलं, तेवढं काम मोदींना चार वर्षांत केलंय. देशात, सध्या विरोधकांचे धोरण फक्त मोदी हटाव असंच आहे. मोदींनी दिल्लीतील दलालांचं राज्य संपुष्टात आणले, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, नुकताच पालिका निवडणुकीत तीन ठिकाणी भाजपाचा विजय झाल्याचं सांगताना, जनतेच्या मनात भाजपाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. निवडणुकीआधी विरोधकांना नेता निवडता येत नाही. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा