शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:26 IST

पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार

वडीगोद्री : कोणालाही घाबरण्याची गरज नाही. ज्यांनी मराठा आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका, मी आता कारभार मराठ्यांच्या हातात दिलाय, आपले मत वाया जाऊ नये, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. रविवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राजकारणापेक्षा आपण सर्वजण मिळून आपल्या आंदोलनाची तयारी करू या. आपल्याला कोणाशी काही देणेघेणे नाही. आजपासून पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पुढच्या वेळी सामूहिक उपोषण करणार असे म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याची भूमिका जाहीर केली आहे. मराठा समाजात संभ्रम नाही. संभ्रम शब्द सारखा वापरला जात आहे, संभ्रम असण्याचे काही कारण नाही. स्वत निवडून येण्यासाठी काही जण संभ्रम पसरवत आहेत. ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, मतदान तुमच्या हातात आहे. तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या ज्याने आपल्या जातीवर अन्याय केला, त्याला पाडा. मराठा समाजाने गावागावात आपल्या आंदोलनाशी सहमत असणाऱ्या उमेदवारांचे व्हिडीओ घ्या. तो व्हिडीओ अगोदरच जाहीर करू नका, असे आवाहन मराठा बांधवांना केले. मी कोणाला पाडण्यासाठी पक्षाचे नाव सांगितले नाही, राज्यभरात कोणालाच पाठिंबा दिला नाही, मी. त्यातून अलिप्त झालो आहे. मविआ, महायुती, अपक्ष यांना कोणालाही मी पाठिंबा दिलेला नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना