शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उत्सव साजरे करताना ध्वनि प्रदूषणावर नियंत्रणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:47 AM

भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्क२ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्या पाठोपाठ नवरात्रोत्सव येतो. या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकर, डी.जे. लावण्यावर मोठा भर असतो. परंतु, हे सर्व करत असताना यातून ध्वनिप्रदूषणही होते. हे टाळण्यासाठी भाविकांनी कमीत कमी आवाजामध्ये ही मंगलवाद्ये वाजविल्यास त्यातून मनाला आनंद तर मिळेलच. शिवाय ध्वनिप्रदूषण रोखण्यासही मदत होईल, असे मत डॉ. संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केले.ध्वनिप्रदूषण नेमके काय आहे?ज्या प्रमाणे डोळे, ह्दय हे अवयव महत्त्वाचे मानले जातात त्याचप्रमाणे प्रत्येकाचे कान हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना बधिरता येण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी पूर्वी भारतीय संस्कृतीत मंगल वाद्य म्हणजेच वाजंत्रीला मोठे महत्त्व होते. आता लाऊडस्पीकरवरच भजन, कीर्तन करण्याची पध्दत रूढ झाली आहे. काळानुरूप ती खरीदेखील आहे. परंतु, त्याचा आवाजही तज्ज्ञांनी घालून दिलेल्या डेसिबलच्या निकषापेक्षा कमी ठेवल्यास कोणालाच त्रास होणार नाही.टाळण्यासाठी कोणते उपाय करावे?आज प्रत्येक ठिकाणी शोर म्हणजेच आवाज ऐकू येतो. यामुळे कधी-कधी ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. मेंदूवर जास्त आवाजाचा ताण आल्यास कान निकामी होऊ शकतात. हे सर्व गंभीर मुद्दे टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. सण, उत्सव साजरे करताना मर्यादित राहूनच लाऊडस्पीकर अथवा डीजेचा आवाज ठेवावा.विना हॉर्न सिटीची गरजअनेक देशांमध्ये वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यावर पूर्णत: बंदी आहे. हीच पध्दत भारतात राबविणे गरजेचे असून, एक दिवस विना हॉर्नचे वाहन चालविण्याची चळवळ उभी व्हावी.शासनाकडून मदतआज अनेक गोरगरीब रूग्णांना कानावरील महागडी शस्त्रक्रिया अथवा डिजिटल श्रवण यंत्र देणे शक्य नाही. अशांसाठी इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून मदत मिळते. तसेच आम्ही देखील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून गोरगरीब रूग्णांना विशेष करून बाल रूग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करतो, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणGanpati Festivalगणेशोत्सव